शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 18:08 IST

भारताची लोकसंख्या वाढत असताना चंद्राबाबू नायडू यांनी हे अजब आवाहन केले आहे.

Chandrababu Naidu Andhra Pradesh : भारताची वाढती लोकसंख्या पाहता केंद्र सरकार 'हम दो हमारे दो'चा सल्ला देत आहेत. पण, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत. होय, हा विनोद नाही...चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशातील जनतेला अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहेत. राज्यातील मुलांच्या जन्मदरामुळे चंद्राबाबू नायडू चिंतेत आहेत. त्यामुळेच ते आता राज्यात लोकसंख्या व्यवस्थापनासाठी योजना आखत आहेत. या योजनेंतर्गत अधिक मुले जन्माला घालणाऱ्या पालकांना प्रशासनाकडून अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

चंद्राबाबूंची 'बच्चे बढाओ' योजना!आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सध्या राज्यातील वृद्धांची वाढती लोकसंख्या पाहता खूप चिंतेत आहेत. ही चिंता जाहीरपणे व्यक्त करताना ते शनिवारी म्हणाले की, राज्याचा लोकसंख्येचा समतोल ढासळत चालला आहे. अशा स्थितीत राज्य सरकार लोकसंख्या व्यवस्थापनासाठी नियोजन करत आहे. याअंतर्गत एक विधेयक आणण्याचाही विचार केला जात आहे, ज्यामध्ये अधिक मुले असलेल्या कुटुंबांना विशेष सुविधा देता येतील. एका कायद्याचाही विचार केला जात आहे, ज्या अंतर्गत दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारे लोकच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतील.

चंद्राबाबूंच्या चिंतेचे कारण काय?चंद्राबाबू नायडू म्हणतात की, राज्यात वृद्धांची लोकसंख्या वाढत आहे. याचे एक कारण म्हणजे, राज्यातील तरुण परदेशात जाऊन स्थायिक होतात. अशा स्थितीत राज्यातील तरुणांची संख्या कमी होत आहे. यावर आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आम्ही एकेकाळी 2 पेक्षा जास्त मुले होऊ नयेत, असा नियम केला होता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. म्हणूनच आम्ही तो नियम बदलला आहे. आता राज्याचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी आम्ही अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत आहोत. 

उत्तर आणि दक्षिण राज्यांमधील लोकसंख्येची घणता दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात लोकसंख्येची घनता जास्त आहे. दक्षिण भारतातील नागरीकरणाचा दर उत्तर भारतापेक्षा जास्त आहे. याचे एक भौगोलिक कारण देखील आहे, कारण सुपीक जमीन, जलस्रोत आणि हवामान यासारख्या भौगोलिक घटकांचा उत्तर भारतातील लोकसंख्येच्या वितरणावर प्रभाव पडतो. तर, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी यासारख्या सामाजिक-आर्थिक घटकांचा देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. चंद्राबाबू नायडू यांनी दक्षिणेकडील राज्यांमधील घटत्या प्रजनन दरावरही चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, येथील प्रजनन दर 1.6 टक्के आहे, तर राष्ट्रीय दर 2.1 आहे, यावरून तुम्हाला परिस्थितीची कल्पना येऊ शकते. जर परिस्थिती अशीच राहिली, तर 2047 पर्यंत आपली वृद्ध लोकसंख्या लक्षणीय वाढेल.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेश