शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Hathras Stampede : सत्संगानंतर झालेल्या चेंगरीचेंगरीतील १२१ जणांच्या मृत्यूला भोले बाबा जबाबदार?; भक्तांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 09:31 IST

Hathras Stampede And Bhole Baba : सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. पण आता या दुर्घटनेनंतर शांतता पसरली आहे. 

कासगंज जिल्ह्यातील बहादूर नगरमध्ये ​​भोले बाबा यांनी २६ वर्षांपूर्वी आश्रम बांधला आहे. हा आश्रम दर मंगळवारी लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेला असायचा, सत्संग होत असे, मात्र सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. पण आता या दुर्घटनेनंतर शांतता पसरली आहे. 

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही भोल बाबांवरील श्रद्धा कमी झाली नसून पुन्हा एकदा आश्रमात लोकांची गर्दी होईल, सत्संग होईल असं त्यांचे भक्त म्हणत आहेत. भक्त नरेश पाल यांनी सांगितलं की, हाथरसच्या चेंगराचेंगरीच्या घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी आहेत. हा एक कट असून काही लोकांनी मुद्दाम महिलांना धक्काबुक्की केली, त्यामुळे महिला पडल्या आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत भोले बाबांची चूक नाही.

फरिदाबादहून आलेल्या भोले बाबांच्या एका भक्ताने सांगितलं की, मी वेडी झाली होती पण भोले बाबांच्या संगतीत आल्यापासून पूर्णपणे बरी झाली आहे. देवाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे घडवून आणलं आहे. जेव्हा तिला विचारण्यात आलं की देव कुठे आहे, तेव्हा ती म्हणाली की येथे आहे, तो सर्वत्र आहे आणि आपण त्याला पाहू शकतो.

पलवल हरियाणातून आलेला भोले बाबांचा भक्त हरवीर सिंह सांगतो की, तो नारायण हरी परमात्मा यांचं दर्शन घेण्यासाठी आला होता. तो २०१६ पासून भोले बाबांशी जोडला गेला आहे. मी आधी दारू प्यायचो, मांसाहारी होतो. पण येथे आलो तेव्हा सर्व काही सोडलं. लाखो लोक येथे येत असत पण या दुर्घटनेमुळे ते घाबरले आहेत त्यामुळे कमी येत असल्याचं त्यांच म्हणणं आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश