शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 09:01 IST

Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  नारायण साकार हरी यांनी नोकरी गेल्यानंतर सत्संगाला सुरुवात केली. सत्संगाला येणाऱ्या महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या. पैशाची गरज सांगितल्यावर सत्संगाला आलेल्या भाविकांकडून देणगी दिली जायची. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढला आणि अनुयायी वाढले. 

शेजारी राहणाऱ्या जगदीश चंद्र यांनी सांगितलं की, २५ वर्षांपूर्वी नारायण साकार हरी यांनी त्यांच्या केदार नगर येथील निवासस्थानी सत्संग करायला सुरुवात केली. सुरुवातीला आजूबाजूच्या भागातील महिला यायच्या. देणग्या गोळा करून आणि मदत करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला. दूर वरूनही अनुयायी येऊ लागले.

नारायण साकार हरी यांचे शेजारी साबीर चौधरी यांनी सांगितलं की, ३० वर्षांपूर्वीपर्यंत ते सामान्य माणसाप्रमाणे जगत होते. २००० नंतर भोले बाबा येथे आलेले नाहीत. येथे दर्शनासाठी दूरदूरवरून अनुयायी येतात. पहाटे ४ वाजल्यापासूनच गर्दी जमू लागते. गगन आणि विकी या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, आम्हाला कोणताही चमत्कार दिसला नाही, मात्र दर मंगळवारी येथे गर्दी जास्त असते. 

साबीर चौधरी सांगतात की, बाबांनी त्यांच्या एका नातेवाईकांची मुलगी स्नेहलता हिला दत्तक घेतलं होतं. २४ वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस मृतदेह येथे ठेवण्यात आला होता. भक्तांनी घोषणाबाजी करत बाबांना मुलीला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. नंतर बाबांनी मृतदेह नेला, तिथे त्यांनी तिला जिवंत करण्यासाठी जप सुरू केला, हजारोंचा जमाव जमला होता. 

जयपूर हायवेवर अभुआपुरा येथे नारायण साकार विश्व हरी चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. गेल्या वर्षीच त्याची खरेदी करण्यात आली होती. आश्रमाच्या गेटवर दररोज दर्शनासाठी अनुयायी येत असतात. २०१९ मध्ये, किरावलीच्या नागला भरंगरपूर विधापूर गावात भोले बाबांचा सत्संग १५ दिवस होता. सत्संग ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत.

हाथरसमधील सिकंदरराव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी १०६ हे यूपीच्या १७ जिल्ह्यांचे रहिवासी आहेत, तर सहा देशांच्या विविध राज्यातील रहिवासी आहेत. उर्वरितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांना राज्य आणि केंद्र सरकार मिळून भरपाई देणार आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सीएम योगी यांनी बुधवारी हाथरस जिल्हा रुग्णालयात जखमींची प्रकृती जाणून घेतली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश