शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 09:01 IST

Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  नारायण साकार हरी यांनी नोकरी गेल्यानंतर सत्संगाला सुरुवात केली. सत्संगाला येणाऱ्या महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या. पैशाची गरज सांगितल्यावर सत्संगाला आलेल्या भाविकांकडून देणगी दिली जायची. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढला आणि अनुयायी वाढले. 

शेजारी राहणाऱ्या जगदीश चंद्र यांनी सांगितलं की, २५ वर्षांपूर्वी नारायण साकार हरी यांनी त्यांच्या केदार नगर येथील निवासस्थानी सत्संग करायला सुरुवात केली. सुरुवातीला आजूबाजूच्या भागातील महिला यायच्या. देणग्या गोळा करून आणि मदत करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला. दूर वरूनही अनुयायी येऊ लागले.

नारायण साकार हरी यांचे शेजारी साबीर चौधरी यांनी सांगितलं की, ३० वर्षांपूर्वीपर्यंत ते सामान्य माणसाप्रमाणे जगत होते. २००० नंतर भोले बाबा येथे आलेले नाहीत. येथे दर्शनासाठी दूरदूरवरून अनुयायी येतात. पहाटे ४ वाजल्यापासूनच गर्दी जमू लागते. गगन आणि विकी या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, आम्हाला कोणताही चमत्कार दिसला नाही, मात्र दर मंगळवारी येथे गर्दी जास्त असते. 

साबीर चौधरी सांगतात की, बाबांनी त्यांच्या एका नातेवाईकांची मुलगी स्नेहलता हिला दत्तक घेतलं होतं. २४ वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस मृतदेह येथे ठेवण्यात आला होता. भक्तांनी घोषणाबाजी करत बाबांना मुलीला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. नंतर बाबांनी मृतदेह नेला, तिथे त्यांनी तिला जिवंत करण्यासाठी जप सुरू केला, हजारोंचा जमाव जमला होता. 

जयपूर हायवेवर अभुआपुरा येथे नारायण साकार विश्व हरी चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. गेल्या वर्षीच त्याची खरेदी करण्यात आली होती. आश्रमाच्या गेटवर दररोज दर्शनासाठी अनुयायी येत असतात. २०१९ मध्ये, किरावलीच्या नागला भरंगरपूर विधापूर गावात भोले बाबांचा सत्संग १५ दिवस होता. सत्संग ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत.

हाथरसमधील सिकंदरराव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी १०६ हे यूपीच्या १७ जिल्ह्यांचे रहिवासी आहेत, तर सहा देशांच्या विविध राज्यातील रहिवासी आहेत. उर्वरितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांना राज्य आणि केंद्र सरकार मिळून भरपाई देणार आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सीएम योगी यांनी बुधवारी हाथरस जिल्हा रुग्णालयात जखमींची प्रकृती जाणून घेतली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश