शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 09:01 IST

Hathras Stampede : भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  

हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान आता भोले बाबांसंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.  नारायण साकार हरी यांनी नोकरी गेल्यानंतर सत्संगाला सुरुवात केली. सत्संगाला येणाऱ्या महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या. पैशाची गरज सांगितल्यावर सत्संगाला आलेल्या भाविकांकडून देणगी दिली जायची. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढला आणि अनुयायी वाढले. 

शेजारी राहणाऱ्या जगदीश चंद्र यांनी सांगितलं की, २५ वर्षांपूर्वी नारायण साकार हरी यांनी त्यांच्या केदार नगर येथील निवासस्थानी सत्संग करायला सुरुवात केली. सुरुवातीला आजूबाजूच्या भागातील महिला यायच्या. देणग्या गोळा करून आणि मदत करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला. दूर वरूनही अनुयायी येऊ लागले.

नारायण साकार हरी यांचे शेजारी साबीर चौधरी यांनी सांगितलं की, ३० वर्षांपूर्वीपर्यंत ते सामान्य माणसाप्रमाणे जगत होते. २००० नंतर भोले बाबा येथे आलेले नाहीत. येथे दर्शनासाठी दूरदूरवरून अनुयायी येतात. पहाटे ४ वाजल्यापासूनच गर्दी जमू लागते. गगन आणि विकी या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, आम्हाला कोणताही चमत्कार दिसला नाही, मात्र दर मंगळवारी येथे गर्दी जास्त असते. 

साबीर चौधरी सांगतात की, बाबांनी त्यांच्या एका नातेवाईकांची मुलगी स्नेहलता हिला दत्तक घेतलं होतं. २४ वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस मृतदेह येथे ठेवण्यात आला होता. भक्तांनी घोषणाबाजी करत बाबांना मुलीला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं. नंतर बाबांनी मृतदेह नेला, तिथे त्यांनी तिला जिवंत करण्यासाठी जप सुरू केला, हजारोंचा जमाव जमला होता. 

जयपूर हायवेवर अभुआपुरा येथे नारायण साकार विश्व हरी चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे. गेल्या वर्षीच त्याची खरेदी करण्यात आली होती. आश्रमाच्या गेटवर दररोज दर्शनासाठी अनुयायी येत असतात. २०१९ मध्ये, किरावलीच्या नागला भरंगरपूर विधापूर गावात भोले बाबांचा सत्संग १५ दिवस होता. सत्संग ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत.

हाथरसमधील सिकंदरराव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी १०६ हे यूपीच्या १७ जिल्ह्यांचे रहिवासी आहेत, तर सहा देशांच्या विविध राज्यातील रहिवासी आहेत. उर्वरितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांना राज्य आणि केंद्र सरकार मिळून भरपाई देणार आहे. या अपघातात ३८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सीएम योगी यांनी बुधवारी हाथरस जिल्हा रुग्णालयात जखमींची प्रकृती जाणून घेतली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश