शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : इंटरनेट बंद, कलम 144 लागू; शेतकऱ्यांच्या आंदोलनापूर्वी 'या' गोष्टींवर घातली बंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:12 IST

Farmers Protest : सीमा सील करण्यासोबतच वाहतूक अॅडव्हायजरी देखिल जारी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरयाणात सातत्याने निर्बंध वाढत आहेत. एकीकडे, हरयाणा सरकारने राज्यातील अंबाला, जिंद, कुरुक्षेत्र, हिसार, कैथल, फतेहाबाद आणि सिरसा या सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवांवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता चंदीगडला लागून असलेल्या पंचकुलामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पंचकुला डीसीपी सुमेर सिंह प्रताप यांनी सांगितले की, मिरवणूक, निदर्शने, पायी किंवा ट्रॅक्टर ट्रॉली आणि इतर वाहनांसह मार्चपास्ट करणे आणि कोणत्याही प्रकारच्या लाठ्या, रॉड किंवा शस्त्रे बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

दरम्यान, 13 फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. यानंतर शेतकऱ्यांना दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पंजाब-हरयाणा सीमा भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाब-हरयाणा सीमा सील करण्यात आल्या आहेत. बॅरिकेड्स, खड्डे, वाळूने भरलेले टिप्पर, काटेरी तारे लावून सीमा बंद केल्या आहेत. एका अधिकृत आदेशानुसार, अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहतील.

सीमा सील करण्यासोबतच वाहतूक अॅडव्हायजरी देखिल जारी करण्यात आली आहे. पंजाब आणि हरयाणाच्या प्रमुख मार्गांवर संभाव्य वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन हरयाणा पोलिसांनी वाहतूक अॅडव्हायजरी जारी केली आहे. मात्र, राज्यातील इतर सर्व मार्गांवर वाहतूक सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये आणि शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

हरयाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) ममता सिंह यांनी सांगितले की, सध्याची रहदारीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी, हरयाणा पोलिसांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म - ट्विटरचे @police_haryana, @DGPHaryana किंवा फेसबुक खाते हरयाणा पोलिसांचे फॉलो करा. तसेच कोणत्याही परिस्थितीत तुम्ही डायल-112 वर संपर्क साधू शकता, असे सांगितले. याचबरोबर, पिहोवाच्या ट्यूकर गावात प्रशासनाने हरयाणा पंजाब सीमा सील केली आहे. 13 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या दिल्लीकडे मोर्चाबाबत हरयाणा प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?MSP साठी कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यामुळे हरयाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीInternetइंटरनेटHaryanaहरयाणा