शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:29 IST

भाजप नेते राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे...

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीत भाजपने एनडीएसाठी ४०० पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएला केवळ २९२ जागा मिळाल्या. अर्थात एनडीएला बहुमत (272) मिळाले आहे. एकट्या भाजपचा विचार करता, या निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या असून तो बहुमतापासून (२७२) दूर राहिला आहे. यानंतर आता भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे. 400 पारचा नारा खोटा होता, असे त्यांनी म्हटले आहे. 

राव इंद्रजित सिंह म्हणाले, टीव्हीवाले मला विचारत होते की 400 पार होईल का, तर मी कसे बोलणार? यावेळी त्यांनी भाजपच्या हरियाणा युनिटवरही प्रश्न उपस्थित केले आणि सर्व काही ठीक नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ग्रामीण भागात माझे कार्यकर्ते नसते तर कदाचित मी ही निवडणूक हरलो असतो, असेही राव इंद्रजित यांनी म्हटले आहे.

राव इंद्रजीत यांनी गुडगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राज बब्बर यांचा पराभव करत 80 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे, मात्र, त्यांच्या विजयाचे अंतर गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 3 लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर २०१४ मध्ये तिरंगी लढत होऊनही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती.

जुण्या विरोधकांचा सामना -  राव 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांचे काही जुने विरोधकही भाजपमध्ये आले आहेत. ही संख्या सुमारे सहा ते आठ एवढी आहे. यांपैकी काही खासदार तर काही आमदारपदाचे दावेदार आहेत. या नेत्यांनी पक्षासाठी व्यासपीठावर येऊन एकजूट दाखवली नाही. भाजपचे प्रमुख नेते ही जागा सर्वात सुरक्षित मानत होते, मात्र राज बब्बर यांच्या विरोधात ही जागा जिंकण्यासाठी राव यांना बरीच मेहनत करावी लागली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024