शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 14:02 IST

Heat Waves In Bihar: बिहारमध्ये अद्याप शाळा सुरू असून, आज राज्यातील बेगुसराय आणि शेखपुरा येथे शाळांमध्ये तब्बल ४८ विद्यार्थिनी वर्गात बेशुद्ध होऊन पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

 सध्या देशातील अनेक भागात उष्णतेचा कहर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी तापमानामध्ये सरासरीपेक्षा कमालीची वाढ नोंदवली जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये तर तब्बल ५० डिग्री (४९.९ डिग्री) एवढं तापमान नोंदवलं गेलं आहे. त्याशिवाय राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पारा वाढला असून, उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. काही राज्यांमध्ये शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. मात्र बिहारमध्ये अद्याप शाळा सुरू असून, आज राज्यातील बेगुसराय आणि शेखपुरा येथे शाळांमध्ये तब्बल ४८ विद्यार्थिनी वर्गात बेशुद्ध होऊन पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

शेखपुरामधील एका शाळेत भयंकर उकाड्यामुळे विद्यार्थिनींची तब्येत एवढी बिघडली की, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. उन्हाळ्याच्य प्रकोपामुळे शेखपुरा जिल्ह्यातील मनकौल उत्कमित मध्य विद्यालयासह इतर काही शाळांमधील विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. यातील काही विद्यार्थिनी ह्या प्रार्थनेवेळी तर काही विद्यार्थिनी ह्या वर्गांमध्ये बेशुद्ध पडल्या.  

एकाच वेळी एवढ्या विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्याने शिक्षकही गोंधळून गेले. या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली, त्यानंतर त्यांनीही शाळेत धाव घेतली. नंतर या विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

दरम्यान, बेगुसरायमध्येही अशीच घटना घडली. तिथे मटिहानी मध्य विद्यालयामध्ये भीषण उकाड्यामुळे १८ विद्यार्थिनी बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. बेगुसरायमध्ये सध्या तापमान ४० डिग्रीच्या वर पोहोचले आहे. तसेच उन्हाळ्याचा कहर सुरू असतानाही शाळा सुरू आहेत.  

टॅग्स :BiharबिहारStudentविद्यार्थीweatherहवामान