शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?; राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 10:43 AM

तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे.

मुंबई - १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी ७५ वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. सरकारनेही स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त सरकारनं हर घर तिरंगा अभियान(Har Ghar Tiranga) हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार आहे. प्रत्येक स्वातंत्र्य देशाचा स्वत:चा राष्ट्रीय ध्वज असतो. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. 

'हर घर तिरंगा' अभियान काय आहे?

तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची सरकारची योजना आहे. यासाठी सरकारने २० कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे, पण एक काळ असा होता की प्रत्येक घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता, असे अनेक बदल घडले, ज्यानंतर सामान्य माणूस घर, कार्यालय, शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकतो. 

२००२ मध्ये ध्वज संहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला. आज जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत आम्ही तिरंग्याच्या ध्वज संहितेतील तरतुदींबद्दल सांगत आहोत. भारतीय ध्वज संहितेच्या कलम २.१ नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक, खाजगी किंवा शैक्षणिक संस्थेत तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, तिरंगा फडकवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण १९७१ च्या Prevention Of Insults To National Honour Act कायद्यांतर्गत काही नियम आहेत जे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.

तिरंगा फडकवण्याचे काय नियम आहेत?

  • तिरंगा फडकवताना तिरंग्याचा आदर सर्वोतोपरी असला पाहिजे हे ध्यानात ठेवावे. कधीही गलिच्छ किंवा फाटलेला झेंडा फडकवू नका.
  • तिरंगा कधीही उलटा फडकवू नये. जेव्हा तुम्ही तिरंगा फडकावता तेव्हा वरच्या बाजूला भगवा रंग दिसला पाहिजे. ध्वज कुणापुढे झुकता कामा नये. तसेच तिरंग्याभोवती इतर कोणताही ध्वज त्याच्यापेक्षा उंच नसावा किंवा त्याच्या बरोबरीचा असू नये. तिरंग्याच्या खांबावर इतर काहीही ठेवू नका. यामध्ये फुलांच्या हार आणि चिन्हाचा समावेश आहे. 
  • तिरंगा फडकवताना तो जमिनीवर किंवा पाण्यात नसावा. तिरंग्याचा वापर ड्रेस म्हणून करू नये. तुम्ही तुमच्या रुमाल, उशी किंवा अशा कोणत्याही वस्तूवर तिरंगा वापरू शकत नाही. तसेच तिरंग्यावर काहीही लिहिता येणार नाही. 
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNational Flagराष्ट्रध्वज