शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

आसाममध्ये हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना, अनेकजण नदीत पडले, जखमींमध्ये ३० विद्यार्थ्यांचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:42 IST

Hanging bridge collapses in Assam: आसाममध्ये एक हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना झाली आहे. त्यामुळे अनेकजण नदीत पडले असून, जखमींमध्ये शाळेतून घरी येत असलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

गुवाहाटी - आसाममध्ये एक हँगिंग ब्रिज तुटून मोठी दुर्घटना झाली आहे. त्यामुळे अनेकजण नदीत पडले असून, जखमींमध्ये शाळेतून घरी येत असलेल्या सुमारे ३० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सोमवारी ज्यावेळी हा हँगिंग ब्रिज तुटला तेव्हा सर्व विद्यार्थी शाळेतून घरी येत होते. ही दुर्घटना करीमगंजच्या राताबारी विधानसभा क्षेत्रातील चेरागिक परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार हा हँगिंग ब्रिज आसाममधील सिंगला नदीवर बांधण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक शाळा आणि अन्य ठिकाणी जाण्यासाठी या ब्रिजचा वापर करत आहेत. सोमवारी चेरागी विद्यापीठ हायस्कूलमधील विद्यार्थी शाळेतून घरी येत होते. तेव्हा अचानक हा ब्रिज तुटला. त्यामुळे त्यावरून जात असलेले विद्यार्थी नदीत पडले. ब्रिज तुटत असताना पाहून आजूबाजूला असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत पुलाच्या दिशेने धाव घेतली आणि नदीत पडलेल्या विद्यार्थ्यांना वाचवले.

या घटनेमध्ये किमान ३० विद्यार्थी जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गाववाल्यांनी सांगितले की, हा हँगिंग ब्रिज तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.    

टॅग्स :AccidentअपघातAssamआसामStudentविद्यार्थी