शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

"दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 11:59 IST

नितीशकुमार यांना भाजपची दारे बंद; महागठबंधन सरकार पडणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा (बिहार): बिहारमध्ये आमचे सरकार आल्यास दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करून ते म्हणाले की, मला सासाराममध्ये जायचे होते; परंतु दुर्दैवाने तेथे हिंसाचार झाल्यामुळे मी जाऊ शकत नाही. यासाठी तेथील जनतेची क्षमा मागतो. संपूर्ण बिहारची चिंता वाटत आहे. बिहारशरीफ, सासाराममध्ये जाळपोळ झाली. २०२४ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत द्या आणि २०२५ मध्ये बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन करा. मग पाहा, दंगेखोरांना सरळ करण्याचे काम भाजप करील, असेही शाह म्हणाले.

नवादा येथील सभेत शाह म्हणाले की, नितीशकुमार यांना भाजपची दारे कायमची बंद झाली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महागठबंधन सरकार पडणार आहे व आमचे सरकार येणार आहे.

‘सुपारीबाजांची नावे द्या, त्यांच्यावर खटला चालवू’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सुपारी’ टिप्पणीवर, राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी रविवारी त्यांना त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी ज्यांनी सुपारी दिली त्यांची नावे सांगा, त्यांच्यावर खटला चालवू, असे आव्हान दिले. भोपाळमधील राणी कमलापती रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर, मोदी म्हणाले होते, ‘‘आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांनी मोदींची प्रतिमा डागाळण्याचा संकल्प केला आहे.”  पंतप्रधान म्हणाले होते, “यासाठी या लोकांनी विविध लोकांना सुपारी दिली आहे. या लोकांना आधार देण्यासाठी काही लोक देशाच्या आत आहेत तर काही देशाबाहेर बसून आपले काम करत आहेत.”

काय म्हणाले सिब्बल?

या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना सिब्बल म्हणाले, ‘‘मोदीजींचा आरोप : ‘त्यांनी मोदींची कबर खोदण्याचे कंत्राट देशातील आणि बाहेरील काही लोकांना दिले आहे.’ कृपया आम्हाला या लोकांची, संस्थांची किंवा देशांची नावे सांगा. हे काही सरकारी गुपित असू शकत नाही. आम्हाला त्यांच्यावर खटला चालवू द्या.”

लालूजी, तेजस्वींना मुख्यमंत्री करण्याचे विसरा!

अमित शाह म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधान व्हायचे आहे, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. बिहारची जनता यात भरडून निघत आहे; परंतु देशाची जनता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे. यामुळे लालूप्रसाद यादव यांनी विसरून जावे की, त्यांच्या मुलाला नितीशकुमार मुख्यमंत्री करतील. लालूंच्या मुलाला नितीशकुमार यांनी साप, पलटूराम व आणखीही काही म्हटले होते; परंतु आता नितीशकुमार पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याच बरोबर गेले आहेत.

एकजुटीची जबरदस्त लाट

राहुल गांधी यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे “विरोधकांच्या एकजुटीची जबरदस्त लाट निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांना एकीचे महत्त्व समजू लागले आहे. जर विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे नवीन कारण मिळाले आणि त्यांनी एकमेकांची मते खाणे थांबविले तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवणे खूप कठीण होऊ शकते. -शशी थरूर, काँग्रेस खासदार

१ एप्रिलपासून ३८४ अत्यावश्यक औषधांच्या आणि एक हजारपेक्षा जास्त फॉर्म्युलेशनच्या किमती ११ टक्क्यांहून अधिक वाढल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. ‘मोदीसाहेब, तुम्ही लोकांचे खिसे कापण्याची ‘सुपारी’ घेतली आहे. -मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :Amit Shahअमित शाहShashi Tharoorशशी थरूरkapil sibalकपिल सिब्बलBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार