शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"दंगेखोरांना उलटे टांगू", गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 11:59 IST

नितीशकुमार यांना भाजपची दारे बंद; महागठबंधन सरकार पडणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा (बिहार): बिहारमध्ये आमचे सरकार आल्यास दंगेखोरांना उलटे टांगून सरळ करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांत झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करून ते म्हणाले की, मला सासाराममध्ये जायचे होते; परंतु दुर्दैवाने तेथे हिंसाचार झाल्यामुळे मी जाऊ शकत नाही. यासाठी तेथील जनतेची क्षमा मागतो. संपूर्ण बिहारची चिंता वाटत आहे. बिहारशरीफ, सासाराममध्ये जाळपोळ झाली. २०२४ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत द्या आणि २०२५ मध्ये बिहारमध्ये भाजपचे सरकार स्थापन करा. मग पाहा, दंगेखोरांना सरळ करण्याचे काम भाजप करील, असेही शाह म्हणाले.

नवादा येथील सभेत शाह म्हणाले की, नितीशकुमार यांना भाजपची दारे कायमची बंद झाली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महागठबंधन सरकार पडणार आहे व आमचे सरकार येणार आहे.

‘सुपारीबाजांची नावे द्या, त्यांच्यावर खटला चालवू’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सुपारी’ टिप्पणीवर, राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी रविवारी त्यांना त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी ज्यांनी सुपारी दिली त्यांची नावे सांगा, त्यांच्यावर खटला चालवू, असे आव्हान दिले. भोपाळमधील राणी कमलापती रेल्वेस्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर, मोदी म्हणाले होते, ‘‘आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांनी मोदींची प्रतिमा डागाळण्याचा संकल्प केला आहे.”  पंतप्रधान म्हणाले होते, “यासाठी या लोकांनी विविध लोकांना सुपारी दिली आहे. या लोकांना आधार देण्यासाठी काही लोक देशाच्या आत आहेत तर काही देशाबाहेर बसून आपले काम करत आहेत.”

काय म्हणाले सिब्बल?

या टिप्पणीला प्रत्युत्तर देताना सिब्बल म्हणाले, ‘‘मोदीजींचा आरोप : ‘त्यांनी मोदींची कबर खोदण्याचे कंत्राट देशातील आणि बाहेरील काही लोकांना दिले आहे.’ कृपया आम्हाला या लोकांची, संस्थांची किंवा देशांची नावे सांगा. हे काही सरकारी गुपित असू शकत नाही. आम्हाला त्यांच्यावर खटला चालवू द्या.”

लालूजी, तेजस्वींना मुख्यमंत्री करण्याचे विसरा!

अमित शाह म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पंतप्रधान व्हायचे आहे, तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. बिहारची जनता यात भरडून निघत आहे; परंतु देशाची जनता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार आहे. यामुळे लालूप्रसाद यादव यांनी विसरून जावे की, त्यांच्या मुलाला नितीशकुमार मुख्यमंत्री करतील. लालूंच्या मुलाला नितीशकुमार यांनी साप, पलटूराम व आणखीही काही म्हटले होते; परंतु आता नितीशकुमार पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याच बरोबर गेले आहेत.

एकजुटीची जबरदस्त लाट

राहुल गांधी यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे “विरोधकांच्या एकजुटीची जबरदस्त लाट निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांना एकीचे महत्त्व समजू लागले आहे. जर विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे नवीन कारण मिळाले आणि त्यांनी एकमेकांची मते खाणे थांबविले तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवणे खूप कठीण होऊ शकते. -शशी थरूर, काँग्रेस खासदार

१ एप्रिलपासून ३८४ अत्यावश्यक औषधांच्या आणि एक हजारपेक्षा जास्त फॉर्म्युलेशनच्या किमती ११ टक्क्यांहून अधिक वाढल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. ‘मोदीसाहेब, तुम्ही लोकांचे खिसे कापण्याची ‘सुपारी’ घेतली आहे. -मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे अध्यक्ष

टॅग्स :Amit Shahअमित शाहShashi Tharoorशशी थरूरkapil sibalकपिल सिब्बलBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार