शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

India Chine Faceoff : दहा महिन्यांपूर्वी परिधान केली होती लष्कराची वर्दी, आता येणार तिरंग्यात लपेटलेले पार्थिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 15:03 IST

India Chine Faceoff : अंकुश ठाकूर हे 2018 मध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते.

ठळक मुद्देअंकुश ठाकूर यांनी दहा महिन्यांपूर्वी लष्करातून सुट्टी घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा लष्कर सेवेत रुजू झाले होते.अंकुश ठाकूर यांचे वडील आणि आजोबा यांनी सुद्धा भारतीय लष्करात सेवा बजावली आहे.

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील 21 वर्षीय अंकुश ठाकूर यांच्याही समावेश आहे.  

अंकुश ठाकूर हे 2018 मध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. ते शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या गावात शोककळा पसरली असून त्यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत.

कड़होता गावचे रहिवासी अंकुश ठाकूर यांनी दहा महिन्यांपूर्वी लष्करातून सुट्टी घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा लष्कर सेवेत रुजू झाले होते. अंकुश ठाकूर यांचे वडील आणि आजोबा यांनी सुद्धा भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. अवघ्या 21 व्या वर्षी अंकुश ठाकूर यांनी देशासाठी आपले प्राण दिले.

लष्कर मुख्यालयातून कड़होतामधील जवान शहीद झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले आहे. अंकुश ठाकूक शहीद झाल्याची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे, असे एसडीएम भोरंज अमित शर्मा यांनी सांगितले. 

याचबरोबर, आज सायंकाळपर्यंत अंकुश ठाकूर यांचे पार्थिक गावात पोहोचेल, असे सांगण्यात येते. तसेच, अंकुश ठाकूर यांच्या लहान भाऊ इयत्ता सहावीमध्ये शिकत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता. मात्र, सोमवारी चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला.

युद्धात सारे काही माफ असते म्हणतात. मात्र, दिलेला शब्द पाळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. मात्र, चीनने मागे हटण्याचा शब्द मोडला आणि नव्या दमाचे सैनिक घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी परतला. 

आणखी बातम्या...

ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत

21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...

चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनIndiaभारतladakhलडाख