शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार
2
सरेंडर व्हायला किती वेळ लागतो? मैत्री एका बाजूला म्हणत राज ठाकरेंचा फडणवीस-शिंदेंवर घणाघाती प्रहार
3
'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा
4
एसबीआय, बँक ऑफ इंडिया की बँक ऑफ बडोदा... सर्वात स्वस्त Home Loan कोण देतंय? ६० लाखांवर किती ईएमआय?
5
"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!
6
कोलकात्यात हायव्होल्टेज ड्रामा; ममता बॅनर्जींकडून ईडीविरोधात FIR वर FIR; प्रकरण कोर्टात पोहोचले...
7
"आधी गोळ्या घालू मग प्रश्न विचारू"; ट्रम्प यांच्या लष्करी धमकीला 'या' देशाने दिलं सडेतोड उत्तर
8
तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे
9
'या' ६ सरकारी स्कीम्समध्ये मिळतो लाखोंचा लाभ, प्रीमिअम ₹१०० पेक्षाही कमी; गरीब असो वा श्रीमंत सर्वच घेऊ शकतात फायदा
10
हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार
11
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
12
१० जानेवारी: गुरु-आदित्य योग: तुमच्या आयुष्यातील अडचणी निवारणासाठी उत्तम योग; करा 'हा' उपाय 
13
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज; का आणि कशी बदलली परिस्थिती?
14
क्रूरतेचा कळस! जेवण वाढायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीला संपवलं; मृतदेहापाशीच बसून राहिला अन्..
15
Stock Market Today: सततच्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला; Vodafone-Idea मध्ये ५% ची तेजी
16
"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
17
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
18
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
19
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
20
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
Daily Top 2Weekly Top 5

...तर देशात हिंसक आंदोलन झालं नसतं; विरोधी पक्षाने केला नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:12 IST

ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे.

ठळक मुद्देपोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी?भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते, विरोधकांचा आरोपजर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल,  सीपीएम नेते सीताराम येन्चुरी, आरजेडीचे मनोज झा, सीपीआयचे डी. राजा आणि एलजेडीचे शरद यादव यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली. आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 

त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसने केला. 

यावेळी बोलताना सीताराम येन्चुरी यांनी सांगितले की, ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे. पोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी? या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला हवी. जर सरकारने संसदेत घटनेविरोधात विधेयक आणलं नसतं तर अशाप्रकारची स्थिती उद्भवली नसती. भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते त्याचा निषेध येन्चुरी यांनी केला. 

रविवारी संध्याकाळी दिल्लीतील जामिया नगर येथे तीन बसेसला आग लावण्यात आली होती. त्यानंतर हा विवाद वाढला. ही आग जामिया विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्यांनी लावली असा आरोप करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा नकार केला. तर भाजपाच्या इशाऱ्यावर काही लोकांनी बसला आग लावली असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन