शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

...तर देशात हिंसक आंदोलन झालं नसतं; विरोधी पक्षाने केला नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:12 IST

ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे.

ठळक मुद्देपोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी?भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते, विरोधकांचा आरोपजर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल,  सीपीएम नेते सीताराम येन्चुरी, आरजेडीचे मनोज झा, सीपीआयचे डी. राजा आणि एलजेडीचे शरद यादव यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली. आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 

त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसने केला. 

यावेळी बोलताना सीताराम येन्चुरी यांनी सांगितले की, ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे. पोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी? या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला हवी. जर सरकारने संसदेत घटनेविरोधात विधेयक आणलं नसतं तर अशाप्रकारची स्थिती उद्भवली नसती. भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते त्याचा निषेध येन्चुरी यांनी केला. 

रविवारी संध्याकाळी दिल्लीतील जामिया नगर येथे तीन बसेसला आग लावण्यात आली होती. त्यानंतर हा विवाद वाढला. ही आग जामिया विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्यांनी लावली असा आरोप करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा नकार केला. तर भाजपाच्या इशाऱ्यावर काही लोकांनी बसला आग लावली असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन