शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

...तर देशात हिंसक आंदोलन झालं नसतं; विरोधी पक्षाने केला नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:12 IST

ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे.

ठळक मुद्देपोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी?भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते, विरोधकांचा आरोपजर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल,  सीपीएम नेते सीताराम येन्चुरी, आरजेडीचे मनोज झा, सीपीआयचे डी. राजा आणि एलजेडीचे शरद यादव यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली. आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी त्यांनी केली. 

त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसने केला. 

यावेळी बोलताना सीताराम येन्चुरी यांनी सांगितले की, ही घटना हिंदू-मुस्लीम नाही तर लोकशाहीवरील हल्ला आहे. संविधानावर हल्ला आहे. पोलिसांना जामिया विश्वविद्यापीठात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी? या प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हायला हवी. जर सरकारने संसदेत घटनेविरोधात विधेयक आणलं नसतं तर अशाप्रकारची स्थिती उद्भवली नसती. भाजपा धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करते त्याचा निषेध येन्चुरी यांनी केला. 

रविवारी संध्याकाळी दिल्लीतील जामिया नगर येथे तीन बसेसला आग लावण्यात आली होती. त्यानंतर हा विवाद वाढला. ही आग जामिया विद्यापीठातील मुस्लीम विद्यार्थ्यांनी लावली असा आरोप करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा नकार केला. तर भाजपाच्या इशाऱ्यावर काही लोकांनी बसला आग लावली असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकagitationआंदोलन