शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ज्ञानवापी खटला जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित; ‘ती’ जागा सुरक्षित, नमाजवर बंदी नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 05:43 IST

मशीद समितीच्या अर्जावर जिल्हा न्यायालयाने सर्वप्रथम निर्णय घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : एखाद्या प्रार्थना स्थळाची धार्मिकता निश्चित करण्यास १९९१च्या प्रार्थना स्थळे कायद्यानुसार बंदी घातलेली नसल्याचे महत्त्वपूर्ण निरिक्षण वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने नाेंदविले.  सर्वाेच्च न्यायालयाने हे प्रकरण दिवाणी न्यायालयाकडून  जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले. 

अयाेध्याप्रकरणाचा दाखला देताना न्या. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, की या कायद्यातील तरतूदी आम्ही हताळल्या आहेत. त्यातील कलम ३ हे अशा प्रकारची निश्चिती करण्यापासून राेखत नाही.  एखाद्या धार्मिक स्थळावर दुसऱ्या धर्माची चिन्हे असल्याने त्या स्थळाची धार्मिकता बदलत नाही. 

न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. सूर्यकांत व न्या. पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी दरम्यान सुमारे ५१ मिनिटे न्यायालयात दाेन्ही पक्षकारांच्या वकिलांमध्ये जाेरदार युक्तिवाद झाला. न्यायालयाने म्हटले, हा खटला क्लिष्ट आणि संवेदनशिल असल्याने याची सुनावणी २५ ते ३० वर्षांचा अनुभव असलेल्यांकडे व्हावी. सध्या सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवर आम्हाला आक्षेप नाही. सर्व पक्षांचे हित सुनिश्चित करण्यात येईल. आम्ही याचिका फेटाळलेली नाही. यापुढेही आमचे द्वार तुमच्यासाठी खुले राहतील.

‘ती’ जागा सुरक्षित, नमाजवर बंदी नाही! 

- ज्या ठिकाणी शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला आहे, ती जागा सुरक्षित करण्यात यावी तसेच मुस्लिमांना नमाज पठणाबाबत पूर्वीचे निर्देश लागू राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

- जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी काही निर्णयापर्यंत येत नाही तोपर्यंत जिल्हा न्यायाधीशांनी वजूकरता पर्यायी व्यवस्था करावी आणि नमाज पठण करण्यात कोणतीही बाधा येता कामा नये, असे निर्देश न्यायालयाने दिले.

सर्वप्रथम या मुद्द्यांवर निर्णय घ्या: १९९१ मध्ये पारित केलेल्या कायद्यानुसार दिवाणी खटला दाखल करता येणार नाही, या मशीद समितीच्या अर्जावर जिल्हा न्यायालयाने सर्वप्रथम निर्णय घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद