शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सफेद वाळवंटात बहरली कमळाची लाली; ४० वर्षात 'या' ठिकाणी प्रथमच BJP नं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 06:19 IST

एकूणच आम आदमी पार्टीमुळे तीन ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचे मानले जात आहे.

रमाकांत पाटीलभूज : सफेद वाळवंटाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातच्या भूज, सुरेंद्रनगर आणि मोरबी जिल्ह्यात यावेळी प्रथमच काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला असून, या तिन्ही जिल्ह्यात सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकून गेल्या ४० वर्षांचा इतिहास रचला आहे. विशेषत: यावेळी निवडणुकीत आम आदमी पार्टीने भाजपविरोधी मतांची विभागणी केल्याने तसेच भाजपची प्रचाराची प्रभावी यंत्रणा, काँग्रेसच्या प्रचारापासून दूर राहिलेले राष्ट्रीय नेते याचा फायदा भाजपला झाल्याचे ठळकपणे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या मतदारसंघाची सुरुवात ज्या भागातून होते त्या भूज जिल्ह्यात भाजपला कधीही सहाच्या सहा जागा मिळविता आल्या नव्हत्या. विशेषत: भूज मतदारसंघात मुस्लीम मतांची संख्या मोठी असतानाही येथे भाजपचे केशुभाई पटेल हे ५९ हजार ८१४ मतांनी विजयी झाले आहेत. 

दसाडा पाटडी या मतदारसंघात भाजपने केवळ दोन हजार १३६ मतांनी विजय मिळविला, तर येथे आपच्या उमेदवाराला १० हजार ६० मते मिळाली आहेत. चोटीला मतदारसंघात भाजपचे उमेदवार २५ हजार मतांनी विजयी झाले. या ठिकाणीदेखील आपच्या उमेदवाराला ४४ हजार मते मिळाली. लिमडीमध्येदेखील भाजपचा २३ हजार मतांनी विजय झाला आहे. येथे आपने ५७ हजार ३८८ मते घेतली. त्यामुळे एकूणच आम आदमी पार्टीमुळे तीन ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचे मानले जात आहे.

दोन भावांच्या लढतीत लहान भावाने मारली बाजीसर्वांत लक्षवेधी ठरलेल्या अंकलेश्वर येथील दोन भावांच्या लढतीत लहान भाऊ भाजपाचे ईश्वरसिंह पटेल यांनी बाजी मारली. ते सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत, तर याच जिल्ह्यातील झगडिया मतदारसंघात सतत सात वेळा विजयी होणारे भारतीय ट्रायबल पार्टीचे छोटू वसावा हे यावेळी मात्र पराभूत झाले आहेत. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेस