शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचं चुलत भावावर होतं प्रेम; घरच्यांनी दुसरीकडे लग्न लावल्याने पतीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:01 IST

गुजरातच्या गांधीनगरमधील एका माणसासाठी वैवाहिक आनंद जीवघेणा ठरला.

Gujarat  Crime :गुजरातच्या गांधीनगरमधील एका माणसासाठी वैवाहिक आनंद जीवघेणा ठरला. गांधीनगरमध्ये एका महिलेने लग्नाच्या चार दिवसांनीच पतीची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे तिच्या चुलत भावावर प्रेम होते. परंतु तिचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते आणि त्यांनी मुलीचे दुसरीकडे लग्न लावून दिलं. मात्र यानंतर लग्नाच्या चौथ्याच दिवशी महिलेने प्रियकरासह पतीची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.

अहमदाबादमधील रहिवासी असलेल्या भाविकचे गांधीनगरमधील पायलशी लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या चार दिवसांनी तिघांनी त्याचे अपहरण करून हत्या केली. प्राथमिक तपासादरम्यान, पायलनेच तिचा चुलत भाऊ कल्पेश याच्यासोबत पतीच्या हत्येचा कट रचला होता, असे समोर आले आहे. कल्पेशवर पायल लग्नाआधीपासून प्रेम करत होती. याच कारणामुळे तिने भावेशला संपवलं.

 भाविकचे लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी अपहरण करण्यात आले. भाविक हा पत्नीला घेण्यासाठी सासऱ्यांकडे जात होता. मात्र तो पत्नीच्या घरी पोहोचला नाही. त्यानंतर सासरच्यांनी भाविकच्या वडिलांना फोन करून भाविक आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर भाविकच्या सासरचे आणि त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. सासरच्या लोकांनी भाविकचा शोध घेतला असता त्याची ॲक्टिव्हा दिसली. जवळच चौकशी केली असता, इनोव्हा कारमधून आलेल्या तिघांनी भाविकला उचलून नेल्याचे समजले. ही माहिती भाविकच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानंतर भाविकच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात या सगळ्या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केला. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच पतीचे अपहरण झाल्यामुळे पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता या प्रकरणात पायलचा सहभाग असल्याचे समोर आलं. पोलिसांनी भाविकच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून भाविकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या पत्नीची चौकशी केली असता पोलिसांचा संशय बळावला आणि तिने सगळंच सांगितले. तिचे चुलत भावावर प्रेम होते, पण घरच्यांनी भाविकशी तिचे लग्न लावून दिले. त्यानंतर पायल आणि कल्पेश यांनी भाविकला त्यांच्या मार्गावरून दूर करण्याचा प्लॅन केला, असं पायलने सांगितले.

लग्नाच्या चौथ्या दिवशी भाविक सासरच्या घरी जात असताना पायलने तो कुठे आहे असे विचारून त्याची माहिती कल्पेशला दिली. त्यानंतर कल्पेश त्याच्या कुटुंबीयांसह इनोव्हामध्ये आला आणि भाविकच्या ॲक्टिव्हाला धडक दिली. त्यामुळे भाविक खाली पडला आणि त्यानंतर त्यांनी त्याचे अपहरण केले. भावेशला गाडीत बसवल्यानंतर त्याची लगेच गळा आवळून हत्या करण्यात आली आणि नंतर तो सापडू नये म्हणून त्याचा मृतदेह नर्मदा कालव्यात फेकून दिला, अशी माहिती कल्पेशने दिली.

भाविकचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी कल्पेश आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून पायललाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. चुलत भावाच्या प्रेमात आंधळी झालेल्या पायलने लग्नाच्या चौथ्याच दिवशी पतीची हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता तिला उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागणार आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसahmedabadअहमदाबाद