शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

Hardik Patel : "काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष', मला २ वर्षे..."; हार्दिक पटेल यांचा जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 1:47 PM

Hardik Patel And Congress : हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष' आहे असं म्हणत हार्दिक पटेल यांनी निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. या वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होण्याआधीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. पाटीदार आरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर २०१५ मध्ये हार्दिक चर्चेत आले होते. जुलै २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. यानंतर आता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष' आहे असं म्हणत हार्दिक पटेल यांनी निशाणा साधला आहे.

"काँग्रेस हा सर्वात मोठा जातिवादी पक्ष आहे आणि राज्य युनिटच्या कार्यकारी अध्यक्षांनी त्यांना कोणतीही कर्तव्ये न सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर आहेत. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही" असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. यासोबतच हार्दिक यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. तसेच मी ज्येष्ठ पाटीदार नेत्यांची आणि मित्रांची माफी मागतो. त्यांनी मला काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला देत सावध केले होते. परंतु मी ऐकलं नाही असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्र शेअर केले आहे. हिंदी, गुजरात आणि इंग्रजीत हे पत्र आहे. या पत्रात म्हटलंय की, २१ व्या युगात भारत जगातील सर्वात युवा देश आहे. देशातील युवकांना एक सक्षम आणि कणखर नेतृत्व हवंय. मागील ३ वर्षापासून मी पाहतोय काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करत आहे. पण देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. अयोध्येत राम मंदिर असो, CAA NRC मुद्दा असो, जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द करणे किंवा जीएसटीबाबत निर्णय असो. देशाला अनेक वर्षापासून यावर तोडगा हवा होता परंतु काँग्रेस पक्ष केवळ बाधा घालण्याचं काम करत होती असं हार्दिकने सांगितले आहे.

तसेच देश असो, गुजरात असो वा पटेल समाज प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारचा विरोध करण्यापर्यंत मर्यादित आहे. काँग्रेसला जवळजवळ सर्वच राज्यातील जनतेने रिजेक्ट केले आहे. कारण काँग्रेस पक्ष नेतृत्व जनतेसमक्ष एक बेसिक रोडमॅप देऊ शकले नाहीत. कुठल्याही मुद्द्याबद्दल गांभीर्य कमी आहे असणं मोठं कारण आहे. मी जेव्हा या गोष्टींबाबत सांगत होतो तेव्हा मोबाईल आणि अन्य गोष्टींवर लक्ष देत होते. जेव्हा जेव्हा देश संकटात होता तेव्हा आमचे नेते परदेशात जात होते. पक्ष नेतृत्वाला गुजरात आणि गुजरातच्या लोकांबद्दल द्वेष असल्यासारखं वाटत असे. अशात गुजरातची जनता काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार? असा प्रश्न हार्दिकनं पत्रात केला आहे.

दरम्यान, आमच्यासारखे कार्यकर्ते स्वत: गाडीचा खर्च करून दिवसाला ५००-६०० किमी प्रवास करत होते. जनतेमध्ये जात होते तेव्हा गुजरातचे मोठे नेते केवळ दिल्लीतील आलेल्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँण्डविच मिळाले का यावर लक्ष देत राहिले. जे गुजरातींचा सन्मान करत नाही अशा पार्टीत का आहात? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जात होता. काँग्रेस पक्षाने युवकांचा भरवसा तोडला आहे. ज्यामुळे कुठलाही युवक काँग्रेससोबत राहू इच्छित नाही असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणBJPभाजपा