शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास 'MSPची हमी', लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 16:48 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांनी आता पुन्हा एकदा दिल्लीकडे आंदोलनासाठी कूच केली आहे. आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आज दिवसभरात तीन वेळा शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या आहेत, दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करुन मोठी घोषणा केली आहे.  'इंडिया आघाडीचे सरकार आल्यास MSP ची हमी', असं ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक! स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांवर किमान MSP कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल १५ कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे', असं या पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे. 

आज काँग्रेसची न्याययात्रा अंबिकापूर येथे आहे, यावेळी संबोधित करताना गांधी म्हणाले, 'मणिपूर भाजपने जाळले. आम्ही आदिवासी भागात जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत. चिनी उत्पादने भारतात विकली जात आहेत. देशात महागाई वाढत आहे. भारत जोडो यात्रेसाठी प्रत्येक राज्यातून लाखो लोक आले आहेत. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडावे लागेल. हिंसाचार न पसरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपचे कार्यकर्ते द्वेष पसरवत आहेत, असा आरोपही गांधी यांनी केला. 

दिल्लीच्या वेशीवर शेतकरी मोठ्या संख्येने

 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पण, गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांचा एक गट सीमेच्या आजूबाजूच्या दुर्गम भागातून आणि वाहने जाऊ शकत नाहीत अशा रस्त्यांवरून पायी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. पंजाबमधील शेतकरी १५०० ट्रॅक्टर आणि ५०० हून अधिक वाहनांसह दिल्लीला रावाना झाले आहेत. आंदोलनस्थळी जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रॅक्टरमध्ये जवळपास ६ महिन्यांचे रेशन शेतकऱ्यांनी सोबत ठेवले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपा