शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पीक विमा योजनेतून खासगी कंपन्यांना घसघशीत नफा; पीएमएफबीवायमध्ये शेतकरी लुबाडले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:17 IST

पीएमएफबीवायमध्ये शेतकरी लुबाडले गेले, महाराष्ट्र, गुजरातेत मोठे नुकसान

हरीश गुप्तानवी दिल्ली : खासगी विमा कंपन्यांनी २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षांत प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून (पीएमएफबीवाय) जवळपास १० हजार कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमावला. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी आणि सरकारने या खासगी विमा कंपन्यांना वरील दोन वर्षांत विम्याचा हप्ता म्हणून ३१,९०५ कोटी रुपये दिले. त्या बदल्यात या कंपन्यांनी शेतकऱ्यांचे २१,९३७ कोटी रुपयांचे विम्याचे दावे अदा केले. या व्यवहारात कंपन्यांनी ९,९६८ कोटी रुपयांचा घसघशीत नफा कमावला.

महाराष्ट्राने हप्त्याचे ४,७८७ कोटी रुपये या कंपन्यांना दिले. कंपन्यांनी दाव्यापोटी फक्त ३,०९४ कोटी रुपये परत दिले. गुजरातमध्ये विम्याचे हप्ते आणि दाव्यांची रक्कम यात १४५ टक्क्यांपेक्षा जास्त फरक आहे. पश्चिम बंगालमध्ये कंपन्यांना २८१ कोटी रुपयांचा हप्ता मिळाला व त्यांनी ५९ कोटी रुपयांचे दावे मान्य केले. याच कारणांमुळे पंजाब, पश्चिम बंगाल आणि इतर अनेक राज्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेतून अंग काढून घेतले आणि आपल्या स्वत:च्या योजना राबविल्या. 

गुजरातसह काही राज्यांनी वर्ष २०२०-२१ मध्ये पीएमएफबीवाय राबविली नाही. या विमा कंपन्यांना हप्त्याची निम्मी रक्कम राज्य आणि केंद्र सरकारने दिली. दुसरे म्हणजे विमा कंपन्या एकूण पीक क्षेत्राच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त कव्हरेज एरिया विस्तारण्यात असमर्थ आहेत. शिवाय दावे निकाली काढण्यात फार मोठा विलंब लागतो.

राज्य    दिलेला हप्ता (कोटींत)    दिलेले दावे(२०१८-१९ आणि २०१९-२०)   (२०१८-१९,२०१९-२०)महाराष्ट्र    ४,७८७    ३,०९४गुजरात    ५,२४५     २,१५८हरयाणा`    १,२८०    १,०१५ओदिशा    २,०९०    १,०२६उत्तर प्रदेश    १,८९५    ५९५पश्चिम बंगाल    २८१    ५९एकूण (सर्व राज्ये)      ३१,९०५    २१,९३५

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र