शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

नवरदेव वरात घेऊन आला पण नवरीसह सासऱ्यामंडळींचा पत्ताच नाही; लग्नाआधी घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 11:44 IST

उन्नावमधून वरात घेऊन आलेला नवरदेव रात्रभर नवरीच्या कुटुंबीयांना शोधत होता. पण त्याला नवरी आणि सासरची मंडळी सापडलीच नाहीत.

लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्नावमधून वरात घेऊन आलेला नवरदेव रात्रभर नवरीच्या कुटुंबीयांना शोधत होता. पण त्याला नवरी आणि सासरची मंडळी सापडलीच नाहीत. अशा परिस्थितीत अखेर नवरदेवाने पोलीस स्टेशन गाठलं आणि याबाबत तक्रार केली आहे. पोलीस आता वधू आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्नावच्या दलेलपूर येथे राहणाऱ्या सोनूची चार वर्षांपूर्वी चंदिगडमध्ये काजल नावाच्या मुलीशी ओळख झाली होती. काजलने तिचे घर लखनौच्या रहिमाबाद हसिमपूर गावात असल्याचं सांगितलं होतं. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

दोघं एकमेकांशी बोलू लागले. याच दरम्यान दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही वेळापूर्वी काजलचे वडील शीशपाल यांच्याशी बोलणं झालं असलं तरी ही चर्चा फोनवरच झाली. यावेळी फोनवरच ११ जुलै रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.

सोनूने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री काजलशी बोलले होते. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून नातेवाईक घरी आल्याचं तिने सांगितलं. लग्नाआधी अनेक कार्यक्रम होणार आहेत. आता लग्नाच्या वरातीत फोनवर बोलणे शक्य होणार नाही. यानंतर फोन बंद झाला. लग्नाची वरात घेऊन नवरदेव लखनौ रहिमाबादला पोहोचताच वधूचा मोबाईल बंद असल्याचं समजलं.

या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सहआयुक्त आकाश कुलहरी यांनी सांगितलं. अशा लोकांचा शोध सुरू आहे ज्यांनी नवरदेवाला लग्नाची वरात घेऊन येण्यास सांगितलं आणि नंतर त्याच्या कुटुंबासह गायब झाले. नवरीने दिलेल्या पत्त्यावर ते सापडले नाहीत. 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारी