शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 14:23 IST

Bihar Crime News: लग्नादरम्यान झालेल्या किरकोळ वादामुळे भर मंडपातून नवरदेवाचंच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

लग्नादरम्यान झालेल्या किरकोळ वादामुळे भर मंडपातून नवरदेवाचंच अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात घडली आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान वधु-वरासह नातेवाईकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वराच्या अपहरणाचा आरोप वरातीमध्ये मनोरंजनासाठी बोलावण्यात आलेल्या लौंडा नाच पार्टीच्या सदस्यांवर करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैकुंठपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघवा दुबौली येथून नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साधू चौक येथील सुरेंद्र शर्मा यांच्या मुलीची वरात आळी होती. लग्नसोहळ्यात मनोरंजनासाठी वर पक्षाने लौंडा नाच पार्टी बोलावली होती. यादरम्यान, नाचगाण्यावरून कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. तसेच काही वेळातच या वादाचं पर्यावसान हाणामारीमध्ये झालं. वाद वाढल्यावर लौंडा नाच पार्टीमधील डझनभर लोकांनी वधूच्या दरवाजापर्यंत धाव घेतली, तसेच तिथे असलेल्या नातेवाईकांना मारहाण केली.

या वादात वधूसह तिची आई आणि इतर महिलाही जखमी झाल्या. हल्लेखोरांनी घरात घुसून दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची लूटही केली. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की त्यांनी मंडपामध्ये बसलेल्या वरालाही सोडलं नाही. तसेच त्याला मारहाण करून गाडीत बसवले आणि त्याचे अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी घनास्थळावरून फरार झाले होते. वर अद्याप बेपत्ता असून, त्यामुळे लग्नघरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नBiharबिहार