शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त! रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवाचा मृत्यू, 1 दिवसापूर्वीच झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:01 IST

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीरच्या सांबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिसेप्शनला जाणाऱ्या नवरदेवावर काळाने घाला घातला आहे. यामध्ये नवरदेवाचा मृत्यू झाला. सांबा येथे झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर सांबा येथील नानके चक गावाजवळ एक ट्रक अचानक उलटला आणि कारला धडक दिली. 

एक दिवस आधीच लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सांबा येथे कारमध्ये दोघेजण बसले होते. 27 वर्षीय रोमी आणि 28 वर्षीय सुशील कुमार कारमध्ये बसले होते. सुशील कुमारचं लग्न एक दिवसापूर्वी झालं होतं आणि ते दोघं रिसेप्शनसाठी जात होते. सांबा येथे जात असताना अपघात झाला. 

सांबा पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या साहाय्याने कारमधून दोन्ही मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी सांबा जिल्हा रुग्णालयात पाठवून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. सुशील कुमारची वाट पाहत असलेल्या नातेवाईकांना या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे. 

एक दिवस आधी लग्न झाल्यामुळे घर आनंदाने भरून गेले होते, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. रिसेप्शनची देखील जोरदार तयारी करण्यात आली होती. पण नवरदेवाच्या मृत्यूने आनंदावर विरजण पडलं. नववधूला या घटनेने फार मोठा धक्का बसला आहे. परिसरात शोककळा पसरली आहे. हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. 

टॅग्स :marriageलग्नAccidentअपघात