शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

अतुलनीय कार्य! 384 वडाची झाडं लावणाऱ्या 106 वर्षीय आजीबाईचा 'पद्मश्री'नं गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 23:14 IST

झाडांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत.

बंगळुरू -  केंद्र सरकारकडून 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील हुलिकल गावच्या 106 वर्षीय आजीबाईंच नाव आहे. झाडांवर प्रेम करणाऱ्या या आजीबाईच नाव आहे सालुमार्दा थिमक्का. तब्बल 106 वर्षीय आजींच्या पर्यावरणप्रेमी कामाची दखल घेत सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे. 

झाडांवर आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत. त्यानंतर, या आजीबाईंनी चक्क झाडं लावण्याचा सपाटाच सुरू ठेवला. त्यामुळे थिमक्कांना आता 'सालुमार्दा थिमक्का' असं नाव मिळाल आहे. सालुमार्दा म्हणजे एका रांगेत लावलेली झाडं. त्यामुळं त्यांच्या गाडीवर 'सालुमार्दा थिमक्का' असं लिहिलेल आहे.

कोणाच्या शेतात काम कर, मजुरी कर असं चालू असताना त्यांना एक धक्का बसला. तो म्हणजे लग्न होऊन भरपूर काळ उलटला तरी या दांपत्याला मूल झालं नाही. मूल न होणं हे वैयक्तिक आणि कौटुंबिक दुःख असलं तरी हुलिकलसारख्या गावात ते सहन करणं कठिणच होतं. नातेवाइकांचे टोमणे मारणं, गावातल्यांनी चिडवणं असल्या प्रकारातून या दोघांनाही मन रमवण्यासाठी काहीतरी हवंच होतं. शक्य त्या सगळ्या देवळांमध्ये जाऊन डोकं ठेवून झालं पण थिमक्का-बिक्कलू यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. त्यावेळी, गावजवळच रस्त्याच काम सुरू होत. या रस्त्याच्या बाजुने एका रांगेत झाडं लावण्याच काम थिमक्कानं सुरू केलं. दररोज एक एक करत तब्बल 384 वडाची झाडं थिमक्काने लावली आणि त्या झाडांची निगाही राखली. विशेष म्हणजे जवळपास 4 किमीचा पट्टा दुतर्फा झाडं लावून थिमक्काने निसर्गमय बनवला आहे. 

अन् थिमक्का सर्वदूर पसरल्या

थिमक्कांचं हे काम बाहेरच्या जगाला कधी समजलं असं उमेशला विचारलं. तर तो म्हणाला, एकदा इथून कर्नाटकातलेच एक खासदार जात होते. गाडीमध्ये अचानक अस्वस्थ वाटू लागल्यावर ते खाली उतरले आणि या झाडांच्या सावलीत बसले. थोड्यावेळात त्यांना बरं वाटलं. पण ही सगळी एका रांगेत कोणी झाडं लावली असं त्यांनी विचारलं तेव्हा त्यांना थिमक्कांचं नाव समजलं. त्यानंतर, खासदारमहोदयांनी सरळ थिमक्कांचं घर गाठलं आणि त्यांचे आभार मानले. नंतर जाताना थिमक्कांच्या हातचं सुग्रास जेवण जेवूनच त्यांना निरोप धाडण्यात आला. हा सगळा अनुभव त्यांनी पुढच्या एका कार्यक्रमात सांगितला. झालं. तेव्हापासून थिमक्काची ओळख सर्वदूर पसरत गेली. आत्तापर्यंत थिमक्काला निसर्गप्रेमी आणि पर्यारवरणवादी संस्थांकडून शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने थिमक्काच्या या निस्वार्थ भावनेनं केलेल्या निसर्गरोपणाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. 

पद्मश्री पुरस्कार काय आहे, हे मला माहीत नाही. या पुरस्कारानं माझं पोट भरत नाही. मला दरमहा 500 रुपये पेन्शन मिळायची. मी वारंवार ती पेन्शन वाढविण्याची मागणी केली. पण, अद्याप त्यात कुठलाही वाढ न झाल्यानं मी ती पेन्शन घेणही बंद केल्याचं थिमक्का सांगतात. प्रशासनाचा निष्काळजीपणा व शासनकर्त्यांच्या अनास्थेमुळे कधी कधी अशा प्रेरणादायी व्यक्तींवर आणि त्यांच्या कार्यावर अन्याय होतो.  

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनBengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटकenvironmentपर्यावरण