शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सरकारला न्यायसंस्था ताब्यात घ्यायची आहे, माजी कायदामंत्री सिब्बल यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:11 IST

देश मोठ्या अडचणीत असल्याचाही केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सरकार न्यायपालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शब्दात राज्यसभा खासदार आणि माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जर त्यांनी तसे केले तर लोकशाहीसाठी चांगले होणार नाही. तसे पाहिले तर सर्व संस्था त्यांनी काबीज केल्या आहेत. न्यायव्यवस्था हा स्वातंत्र्याचा शेवटचा बालेकिल्ला आहे, असेही ते म्हणाले.

सिब्बल म्हणाले की, सरकार अशी परिस्थिती बनविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे, ज्यात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय न्यायिक आयोग (एनजेएसी) ची चाचणी होऊ शकते. तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एनजेएसी कायदा हा असा कायदा आहे, ज्याने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची कॉलेजियम प्रणाली उलथून टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये रद्द केले होते आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता सिब्बल म्हणाले की, जेव्हा उच्चपदावरील व्यक्ती अशी टिपणी करते तेव्हा प्रथम हा प्रश्न विचारला पाहिजे की, ती व्यक्ती असे वैयक्तिक बोलत आहेत की, सरकारकडून बोलत आहेत.

देश मोठ्या अडचणीत

सिब्बल यांनी असा आरोप केला की, सरकारचा हेतू स्पष्ट आहे. उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या अधिकारावर त्यांना कब्जा करायचा आहे. सिब्बल म्हणाले की, लडाख आणि अरुणाचलमध्ये चिनी लोक आपल्या हद्दीत घुसखोरी करत आहेत. येऊ घातलेली जागतिक मंदी पाहता देश मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलIndiaभारत