शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकारला न्यायसंस्था ताब्यात घ्यायची आहे, माजी कायदामंत्री सिब्बल यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:11 IST

देश मोठ्या अडचणीत असल्याचाही केला दावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सरकार न्यायपालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा शब्दात राज्यसभा खासदार आणि माजी कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी रविवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जर त्यांनी तसे केले तर लोकशाहीसाठी चांगले होणार नाही. तसे पाहिले तर सर्व संस्था त्यांनी काबीज केल्या आहेत. न्यायव्यवस्था हा स्वातंत्र्याचा शेवटचा बालेकिल्ला आहे, असेही ते म्हणाले.

सिब्बल म्हणाले की, सरकार अशी परिस्थिती बनविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे, ज्यात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय न्यायिक आयोग (एनजेएसी) ची चाचणी होऊ शकते. तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एनजेएसी कायदा हा असा कायदा आहे, ज्याने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची कॉलेजियम प्रणाली उलथून टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये रद्द केले होते आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. यासंदर्भात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता सिब्बल म्हणाले की, जेव्हा उच्चपदावरील व्यक्ती अशी टिपणी करते तेव्हा प्रथम हा प्रश्न विचारला पाहिजे की, ती व्यक्ती असे वैयक्तिक बोलत आहेत की, सरकारकडून बोलत आहेत.

देश मोठ्या अडचणीत

सिब्बल यांनी असा आरोप केला की, सरकारचा हेतू स्पष्ट आहे. उच्च न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांची नियुक्ती करण्याच्या अधिकारावर त्यांना कब्जा करायचा आहे. सिब्बल म्हणाले की, लडाख आणि अरुणाचलमध्ये चिनी लोक आपल्या हद्दीत घुसखोरी करत आहेत. येऊ घातलेली जागतिक मंदी पाहता देश मोठ्या अडचणीत आहे. त्यामुळे सरकारने विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलIndiaभारत