शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

मोदी सरकार सरदार पटेल यांच्या नावे देणार सर्वोच्च नागरी पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:52 IST

केंद्र सरकार भारताची एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या यथोचित गौरवासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सर्वोच्च नागरी पुरस्कार देणार आहे.

ठळक मुद्देसरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे.राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला या पुरस्कारांची घोषणा केली जाणार

नवी दिल्ली - केंद्र सरकार भारताची एकता आणि अखंडतेसाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या यथोचित गौरवासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सर्वोच्च नागरी पुरस्कार देणार आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करुन गौरव करण्यात येणार आहे. विशेष अपवाद वगळता हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार नाहीत. या पुरस्कारासोबत कोणतीही रोख रक्कम महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिली जाणार नाही. 

राष्ट्रीय एकता दिवस म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला (31 ऑक्टोबर) या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे. गृह मंत्रालयाने याआधीही सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सुरू करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अखंड भारताचे मूल्य अधिक सुदृढ करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पद्म पुरस्कारांप्रमाणेच राष्ट्रपती भवनात सोहळा आयोजित करुन महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.

पंतप्रधानांकडून पुरस्कार समिती स्थापन केली जाईल. यामध्ये मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, राष्ट्रपतींचे सचिव, गृह सचिव सदस्य असतील. याशिवाय पंतप्रधानांनी नियुक्त केलेले तीन-चार जणही या समितीवर निवडले जातील. भारतातील कोणतीही संस्था किंवा संघटना किंवा भारतीय नागरिक या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचं नामांकन करू शकतो. तसेच एखादी व्यक्ती स्वत: चं नाव देखील नामांकन म्हणून देऊ शकते. राज्य सरकार, केंद्रशासित राज्यातील प्रशासन, मंत्रालयही नामांकन पाठवू शकतात. दरवर्षी पुरस्कारासाठी अर्ज मागवले जातील. गृहमंत्रालयाने तयार केलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर केले जाऊ शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कलम 370 हटवल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार केल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र, कलम 370 मुळे त्यांचे स्वप्न साकार होऊ शकत नव्हते. सध्या ‘एक राष्ट्र, एक संविधान’ या घोषणेची गरज असून 370 आणि कलम 35 ए हटवल्यामुळे वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न साकार होण्याकडे एक पाऊल टाकले असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत