शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
3
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
4
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
5
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
6
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
7
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
8
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
9
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
10
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
11
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
12
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
13
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
14
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
15
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
16
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
17
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
18
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
19
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
20
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:21 IST

वाहतुकीतील गुंतवणुकीमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोलकाता यांच्या अलिकडच्याच एका अभ्यासातून दिसून आले असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - केंद्रीय कॅबिनेट बैठकीत बुधवारी झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या २ मल्टीट्रॅकिंग योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या पाऊलामुळे प्रवास सुविधेत सुधारणा होईल. लॉजिस्टिक खर्च कमी होईल. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनात घट होईल ज्यातून टिकाऊ आणि कुशल रेल्वे संचालनाला चालना मिळेल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, कोडरमा ते बरकाकाना या दरम्यान १३३ किमी डबल लेनला मंजुरी मिळाली आहे. ज्याचा खर्च ३०६३ कोटी इतका आहे. त्यातून पटणा आणि रांची यांच्यातील अंतर कमी होईल. यामुळे कोडरमा, चतरा, हजारीबाग, रामगड जिल्ह्याला चांगली कनेक्टिविटी मिळू शकते. या प्रकल्पातून निर्माण होणारे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सात कोटी झाडे लावण्याइतके असेल. यामुळे देशातील दरवर्षी ३२ कोटी लिटर डिझेलची बचत होईल. याचा फायदा ९३८ गावांना आणि १५ लाख लोकसंख्येला होईल. त्यातून ३०.४ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक होऊ शकते  जे रस्त्याने वस्तू पाठवण्यापेक्षा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगले ठरेल असं त्यांनी सांगितले. 

बल्लारी-चिकजाजूर मल्टीट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी

त्याशिवाय केंद्र सरकारने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भारतीय रेल्वेच्या बेल्लारी चिकजापूर मल्टिट्रॅकिंग प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. इथेही डबल लेन केली जाईल. ज्यातून मंगळुरू पोर्टहून थेट कनेक्टिविटी तयार होईल. या प्रकल्पामुळे १८५ किमी रेल्वे लाईन डबलिंग केले जाईल. ज्याला ३३४२ कोटी इतका खर्च असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कारकि‍र्दीत परिवहन आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्याच्या दृष्टीने रेल्वे अनेक प्रकल्प आणत आहे. वाहतुकीतील गुंतवणुकीमुळे देशातील लॉजिस्टिक्स खर्च सुमारे ४ टक्क्यांनी कमी झाला आहे असं आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोलकाता यांच्या अलिकडच्याच एका अभ्यासातून दिसून आले असंही रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं. 

दरम्यान, २८ मे रोजी केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन, तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली होती. धानाची नवीन एमएसपी २,३६९ रुपये निश्चित करण्यात आली, जी मागील एमएसपीपेक्षा ६९ रुपये जास्त आहे. कापसाचा नवीन एमएसपी दर ७,७१० रुपये निश्चित करण्यात आला होता.

टॅग्स :railwayरेल्वेNarendra Modiनरेंद्र मोदीJharkhandझारखंडKarnatakकर्नाटक