शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ओबीसी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष, जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे; राहुल गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 13:08 IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली: राज्यसभेने 'नारी शक्ती वंदन विधेयक' मंजूर केले, ज्यात संसद आणि राज्य विधानसभांच्या कनिष्ठ सभागृहात महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. विधेयक मंजूर झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ सभागृहात उपस्थित होते. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने २१५ मते पडली, तर विरोधात एकही मत पडले नाही. याच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करण्यात आले. 

'नारी शक्ती वंदन विधेयक' कायदा झाल्यानंतर, ५४३ सदस्यांच्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या सध्याच्या ८२ वरून १८१ वर जाईल. राज्य विधानसभेतही महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव असतील. 'नारी शक्ती वंदन विधेयक' मंजूर झाल्यानंतर भाजप महिला मोर्चाने आज भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात पोहोचल्यावर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. याचवेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

मोदी सरकारकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू करावे, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच मतदार विभाग आणि जनगणनाबाबतचे कलम काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली. आरक्षण आजच लागू केले जाऊ शकते. ही काही गुंतागुंतीची बाब नाही, पण सरकारला हे करायचे नाही. सरकारने ते देशासमोर मांडले आहे. तसेच १० वर्षांनंतर त्याची अंमलबजावणी होणार असून ती नक्की होईल की नाही, हे देखील माहिती नाही, असा निशाणा राहुल गांधींनी साधला. 

महिला आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला, पण ओबीसी समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. देशात ओबीसींची संख्या किती आहे, हे कळायला हवे. एससी, एसटी, आदिवासी सचिव किती आहे, हे मोदींनी सांगावे. जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली. एकदा मी ठरवले की मी ते सोडत नाही. भारतात ओबीसींची टक्केवारी किती आहे, ती फक्त पाच टक्के आहे का, असेल तर ठीक आहे, नाहीतर मला शोधावे लागेल, असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले. 

आता विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल!

राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने २१४ मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात एकही मत पडले नाही. हे विधेयक आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाणार आहे. त्यांची मंजुरी मिळताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आणि संसदेचे विशेष अधिवेशन संपले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीWomen Reservationमहिला आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार