शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारची 'अरुंधती स्वर्ण योजना', मुलीच्या लग्नात 1 तोळं सोनं भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 14:56 IST

नवीन वर्षात लग्न करायचा तुमचा विचार असेल तर सरकारकडून तुम्हाला सोनं मिळणार आहे.

नवी दिल्ली - भारतीय परंपरेत लग्न आणि सोनं हे अतुट नातं बनलंय. गरिबातील गरीब व्यक्तीही आपली मुलीच्या लग्नासाठी सोन्याची शक्य तेवढी सोय करतोच. तर, मंगळसुत्र या पवित्र दागिन्याचीही सोन्याशिवाय कल्पनाच शक्य नाही. मात्र, अनेकदा हेच सोनं लग्नसारख्या पवित्र बंधनात आडकाठी ठरत, याच सोन्यावरुन रुसवे फुगवे, राजी-नाराजी होते. आता, सरकारनेही ही काहीसी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.

नवीन वर्षात लग्न करायचा तुमचा विचार असेल तर सरकारकडून तुम्हाला सोनं मिळणार आहे. मात्र, हा लाभ केवळ आसाममधील नागरिकांनाच घेता येईल. कारण, आसाम सरकारने याबाबत निर्णय घेतला असून अरुंधती स्वर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार कमीत कमी 10 वी पर्यंत शिक्षण झालेल्या मुलीच्या लग्नात सरकारकडून 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा सोनं भेट किंवा आहेर स्वरुपात देण्यात येणार आहे. 

अरुंधती स्वर्ण योजनेसाठी सरकारने काही अटीही बंधनकारक केल्या आहेत. त्यानुसार, मुलीच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असावे, मुलीचे पहिलेच लग्न असावे अशीही अट या योजनेसाठी आहे. या योजनेसाठी आसाम सरकारने 300 कोटी रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे. लग्नाच्या नोंदणी आणि पडताळणीनंतर सरकारकडून संबंधित मुलीच्या बँक खात्यात 30 हजार रुपये जमा होतील. त्यानंतर, सोनं खरेदीची पावती जमा करणे बंधनकारक आहे. कारण, इतर कुठलिही वस्तू या पैशाच्या माध्यमातून खरेदी करता येणार नाही. आसाम सरकारची ही योजना स्त्री जन्माचे स्वागत आणि मुलींच्या वडिलांना दिलासा देणारी आहे.  

टॅग्स :AssamआसामGoldसोनंmarriageलग्न