शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:00 IST

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकसोबत शस्त्रसंधी आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुंतवणूक वाढीसाठी आणि प्राप्तीकर व कंपनी कायद्यांमध्ये सुलभता आणण्यासाठी अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची तयारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली आहे. १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मुभा देणारे विमा (दुरुस्ती) विधेयक, नियमांचे सुलभीकरण केलेले आयकर विधेयक, व जलद कंपनी विलीनीकरणासंदर्भातील कंपनी कायदा, २०१३ मधील सुधारणा आणि दिवाळखोरी आणि नादारी कायदा (आयबीसी), २०१६ ही आणखी काही महत्त्वाची सुधारणा विधेयके अधिवेशनात सादर केली जाऊ शकतात.

हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन

सुधारणांचा उद्देश काय?

सरकार विमा क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणूक आणि कॉम्पोझिट लायसन्सिंगची तरतूद असलेले दुरुस्ती विधेयक आणणार आहे. दिवाळखोरी आणि नादारी कायद्यातील बदल हे संकटग्रस्त कंपन्यांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी केले जाणार आहेत.

सुलभ आयकर विधेयक

संसदेच्या निवड समितीचा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर झाला तर नवे सुलभ आयकर विधेयक पहिल्या दिवशी मांडले जाऊ शकते. कंपनी कायद्यातील कलम २३३ अंतर्गत ‘फास्ट ट्रॅक विलीनीकरण’ प्रक्रियेची व्याप्ती वाढवणारी दुरुस्तीही सरकार अधिवेशनात मांडण्याच्या तयारीत आहे.

केवळ १७ दिवसांचे अधिवेशन

हे अधिवेशन केवळ १७ दिवसांतच आटोपले जाणार आहे. अधिवेशनाचे सुप १२ ऑगस्टला वाजेल. विरोधकांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानसोबत अचानक शस्त्रसंधी केली जाणे, बिहारमधील निवडणूक यादीतील फेरबदल, आदी मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी सांसदीय आयुधे परजून ठेवली आहेत. त्यामुळे सरकारला भरगच्च आर्थिक अजेंडा कामकाजात रेटणे किती शक्य होईल, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विरोधक आक्रमक होणार

सध्याच्या घडीला ‘इंडिया’ आघाडीतील अनेक घटक पक्ष राज्यपातळीवर विखुरलेले दिसतात. पण संसदेमध्ये हे पक्ष मतभेद विसरून एकत्र येतात आणि संयुक्त रणनीती आखत असल्याचे चित्र बघायला मिळते. पहलगाम दहशतवादी हल्ला मुद्द्यावर सरकारने मागणी करूनही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी थेट केवळ १७ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख तब्बल ४७ दिवस आधीच जाहीर केल्यामुळे विरोधक नाराज आहेत.

‘इर्डा’ला नवीन अधिकार : जेथे विमा सेवा अजूनही पोहोचलेली नाही किंवा अत्यल्प आहे, अशा क्षेत्रांसाठी किमान भांडवल मर्यादा किमान ५० कोटी रुपये इतकी कमी करण्याचे अधिकार विमा नियामक व विकास प्राधिकरणाला (इर्डा) देण्याची तयारीही सरकारने केली आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभा