शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
2
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
3
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
4
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
5
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
6
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
7
VIDEO: आजोबांच्या धाडसाला सलाम! ८० वर्षांच्या 'तरूणा'चे १५००० फूट उंचीवरून 'स्कायडायव्हिंग'
8
एक विवाह ऐसा भी! नवरदेवाने हुंड्याचे ७ लाख केले परत; म्हणाला, "आम्हाला फक्त १ रुपया अन्..."
9
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
10
महायुतीत नाराजीचा स्फोट, शिंदे गटातील मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव, तर उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला 
11
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
12
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
13
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
14
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
15
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
16
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
18
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
19
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
20
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:00 IST

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकसोबत शस्त्रसंधी आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गुंतवणूक वाढीसाठी आणि प्राप्तीकर व कंपनी कायद्यांमध्ये सुलभता आणण्यासाठी अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची तयारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली आहे. १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला मुभा देणारे विमा (दुरुस्ती) विधेयक, नियमांचे सुलभीकरण केलेले आयकर विधेयक, व जलद कंपनी विलीनीकरणासंदर्भातील कंपनी कायदा, २०१३ मधील सुधारणा आणि दिवाळखोरी आणि नादारी कायदा (आयबीसी), २०१६ ही आणखी काही महत्त्वाची सुधारणा विधेयके अधिवेशनात सादर केली जाऊ शकतात.

हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन

सुधारणांचा उद्देश काय?

सरकार विमा क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणूक आणि कॉम्पोझिट लायसन्सिंगची तरतूद असलेले दुरुस्ती विधेयक आणणार आहे. दिवाळखोरी आणि नादारी कायद्यातील बदल हे संकटग्रस्त कंपन्यांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी केले जाणार आहेत.

सुलभ आयकर विधेयक

संसदेच्या निवड समितीचा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर झाला तर नवे सुलभ आयकर विधेयक पहिल्या दिवशी मांडले जाऊ शकते. कंपनी कायद्यातील कलम २३३ अंतर्गत ‘फास्ट ट्रॅक विलीनीकरण’ प्रक्रियेची व्याप्ती वाढवणारी दुरुस्तीही सरकार अधिवेशनात मांडण्याच्या तयारीत आहे.

केवळ १७ दिवसांचे अधिवेशन

हे अधिवेशन केवळ १७ दिवसांतच आटोपले जाणार आहे. अधिवेशनाचे सुप १२ ऑगस्टला वाजेल. विरोधकांनी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानसोबत अचानक शस्त्रसंधी केली जाणे, बिहारमधील निवडणूक यादीतील फेरबदल, आदी मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी सांसदीय आयुधे परजून ठेवली आहेत. त्यामुळे सरकारला भरगच्च आर्थिक अजेंडा कामकाजात रेटणे किती शक्य होईल, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विरोधक आक्रमक होणार

सध्याच्या घडीला ‘इंडिया’ आघाडीतील अनेक घटक पक्ष राज्यपातळीवर विखुरलेले दिसतात. पण संसदेमध्ये हे पक्ष मतभेद विसरून एकत्र येतात आणि संयुक्त रणनीती आखत असल्याचे चित्र बघायला मिळते. पहलगाम दहशतवादी हल्ला मुद्द्यावर सरकारने मागणी करूनही संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी थेट केवळ १७ दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख तब्बल ४७ दिवस आधीच जाहीर केल्यामुळे विरोधक नाराज आहेत.

‘इर्डा’ला नवीन अधिकार : जेथे विमा सेवा अजूनही पोहोचलेली नाही किंवा अत्यल्प आहे, अशा क्षेत्रांसाठी किमान भांडवल मर्यादा किमान ५० कोटी रुपये इतकी कमी करण्याचे अधिकार विमा नियामक व विकास प्राधिकरणाला (इर्डा) देण्याची तयारीही सरकारने केली आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभा