शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारलाच अजून सिनेमा समजलेला नाही

By admin | Updated: November 25, 2014 01:18 IST

सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांची टीका : फसव्या मार्केटिंगमुळे संस्कृतीचे नुकसान
पणजी : सरकारला सिनेमा म्हणजे काय याची जाणीव नाही. कतरिना कैफ व शाहरूख खान यांचा सिनेमा म्हणजेच खरा सिनेमा असा सरकारचाही समज झाला आहे. त्यामुळे सिनेमाचा दर्जा तर घसरत तर आहेच; पण त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचेही नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी देशातील सिनेमाबाबत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
‘उद्याचा सिनेमा’ या विषयावर झालेल्या ‘मास्टर क्लास’मध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. घई म्हणाले की, सिनेमा हा समाजाचे प्रतिबिंब मांडतो. भारतीय सिनेमा सत्यजीत राय यांच्या नावाने ओळखला जातो; कारण त्यांच्या सिनेमांत भारताचे प्रतिबिंब उमटले. नवीन कलाकारांना सिनेसृष्टीत संधी मिळत नाही; कारण सिनेतारकांच्या मुलांनीच सिनेसृष्टीवर अधिराज्य प्रस्थापित केले आहे.
दिग्दर्शक भवन लाल यांनी सिनेमाविषयी आपल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले, सगळ्यात जास्त मान कलाकाराला मिळतो; कारण कलाकार हा सगळ्यात सुशिक्षित माणूस असतो. भारतात सिनेमा हा धर्म आहे. सिनेमा हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी सिनेमा म्हणजे तंत्रज्ञान व व्यवसायही आहे. सिनेमा म्हणजे कल्पना आणि नवनिर्मिती आहे. ‘सोने की चिडीया’वाला देश ‘रोटी कपडा और मकान’ सिनेमांवर येऊन समाप्त झाला; कारण हीच आता गरज बनली आहे, असे घई म्हणाले. सिनेमा हा देशाचा सर्वात मोठा राजदूत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतात सांस्कृ तिक मंत्र्यांना काडीचीही किंमत नाही. भारताची संस्कृती हाच उद्याचा सिनेमा आहे. असे सिनेमा आले नाही तर ‘हॅपी न्यू ईयर’सारखेच सिनेमा चालत राहणार. मार्केटिंग ही एक फसवणूक आहे आणि आपला सिनेमा मार्के टिंगमुळे निम्न पातळीवर घसरला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)