शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम फत्ते केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 10:18 IST

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ठळक मुद्देशेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चंढीगड - राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे, केंद्र सरकारने आक्रमक पाऊलं उचलत पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, पंजाब आणि हरयाणामध्येइंटरनेट बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मंदिरावर कर्णा म्हणजे स्पीकर लाऊन गावागातील शेतकऱ्यांपर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचं काम केलंय.  

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे, सरकारने इंटरनेट बंद केले असले तरी, आपल्या कल्पतेतून हरयाणातील शेतकऱ्यांनी गुरुद्वारा आणि मंदिरावर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरवरुन आपला संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. गावागावातील मंदिराबाहेर लाऊडस्पीकर ऐकण्यासाठी शेतकरी जमा होत आहेत. जिंद जिल्ह्यातील 17 खाप पंचायतीच्या प्रमुखांनी मंदिराच्या लाऊडस्पीकवरुन लोकांपर्यंत संदेश पोहविण्याच्या कामाला गती दिली आहे. तसेच, आंदोलनासंदर्भात सूचना आणि रणनितीही आखण्यात या लाऊडस्पीकरचा मोठा उपयोग होत आहे. त्यामुळेच, शेतकऱ्यांसारखा जुगाड कुणीही करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील 17 जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे. केवळ मोबाईल रिचार्ज आणि बँकींग व्यवहार सोडून सर्व एसएमएस सर्व्हीस 31 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आता, यामध्ये वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.  

2 फेब्रुवारीला होणार चर्चेची दुसरी फेरी

शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व सरकारदरम्यान चर्चेची पुढची फेरी २ फेब्रुवारी होणार असल्याचे वृत्त आहे. तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.  शनिवारी पंतप्रधानांनी म्हटले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहेत. २२ जानेवारीला सरकार आणि संघटनांमध्ये चर्चेची १२ वी फेरी झाली. पण, सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याच्या प्रस्तावाशिवाय अन्य पाऊल उचलण्याची तयारी दाखविली नाही. हा प्रस्ताव फेटाळून कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने कोंडी ‘जैसे थे’आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपInternetइंटरनेट