शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने इंटरनेट बंद केलं, शेतकऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन काम फत्ते केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 10:18 IST

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ठळक मुद्देशेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चंढीगड - राजधानी दिल्लीत गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं शांततेत आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रजासत्ताकदिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यामुळे, केंद्र सरकारने आक्रमक पाऊलं उचलत पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार, आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, पंजाब आणि हरयाणामध्येइंटरनेट बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी मंदिरावर कर्णा म्हणजे स्पीकर लाऊन गावागातील शेतकऱ्यांपर्यंत आपला संदेश पोहोचविण्याचं काम केलंय.  

शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील असतो, आपल्या लहानसहान कृतीतून तो शेतीची अनेक कामे सहजच करुन जातो. त्यामुळे, शेतकऱ्यांएवढा जुगाड दुसरा कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे, सरकारने इंटरनेट बंद केले असले तरी, आपल्या कल्पतेतून हरयाणातील शेतकऱ्यांनी गुरुद्वारा आणि मंदिरावर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरवरुन आपला संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली आहे. गावागावातील मंदिराबाहेर लाऊडस्पीकर ऐकण्यासाठी शेतकरी जमा होत आहेत. जिंद जिल्ह्यातील 17 खाप पंचायतीच्या प्रमुखांनी मंदिराच्या लाऊडस्पीकवरुन लोकांपर्यंत संदेश पोहविण्याच्या कामाला गती दिली आहे. तसेच, आंदोलनासंदर्भात सूचना आणि रणनितीही आखण्यात या लाऊडस्पीकरचा मोठा उपयोग होत आहे. त्यामुळेच, शेतकऱ्यांसारखा जुगाड कुणीही करु शकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिरिक्त तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असतानाच पंजाब-हरयाणामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर हरयाणातील 17 जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुक्राल यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह दिल्लीतील हिंसाचारानंतर राज्यातील कायदा व सुरक्षाव्यवस्था कोणत्याही किंमतीत कोलमडता कामा नये, असे आदेश राज्याच्या पोलीस विभागाला दिले आहेत, असं ठुक्राल यांनी म्हटलं आहे. केवळ मोबाईल रिचार्ज आणि बँकींग व्यवहार सोडून सर्व एसएमएस सर्व्हीस 31 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. आता, यामध्ये वाढ करण्यात आली असून 1 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.  

2 फेब्रुवारीला होणार चर्चेची दुसरी फेरी

शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व सरकारदरम्यान चर्चेची पुढची फेरी २ फेब्रुवारी होणार असल्याचे वृत्त आहे. तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.  शनिवारी पंतप्रधानांनी म्हटले होते की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहेत. २२ जानेवारीला सरकार आणि संघटनांमध्ये चर्चेची १२ वी फेरी झाली. पण, सरकारने दीड वर्षे कायदे स्थगित करण्याच्या प्रस्तावाशिवाय अन्य पाऊल उचलण्याची तयारी दाखविली नाही. हा प्रस्ताव फेटाळून कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने कोंडी ‘जैसे थे’आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपInternetइंटरनेट