शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

सरकारने जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 4:49 AM

रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाचा समारोप

नागपूर : देशातील जनतेने भाजप सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दर्शविला आहे. २०१४ च्या तुलनेत अधिक जागा निवडून दिल्या आहेत. याचाच अर्थ जनतेच्या काही अपेक्षा या सरकारने पूर्ण केल्या होत्या तर काही अपूर्ण आहेत. अपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच जनतेने पुन्हा संधी दिली आहे. तेव्हा सरकारने जबाबदारीने त्या पूर्ण केल्याच पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी नागपुरातील रेशीमबाग मैदानात पार पडला. स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाला पू. चित्तरंजन जी महाराज (आगरतळा), कृष. गोपालकृष्ण जी (बंगळुरु). यशराज व युवराज (दिल्ली), डॉ. कृष्णास्वामी (कोईम्बतुर), पाचीपाला दोरा स्वामी, रमेश (जालंधर) आणि श्री हासन वासजी ढेम्पो (गोवा) हे प्रमुख अतिथी होते.नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे पहिल्यांदाच स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. त्यामुळे ते काय बोलतात, याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यांनी, सरकारने कुठल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात हे स्पष्टपणे सांगितले नाही. परंतु ते म्हणाले, देशातील मतदार हे पहिल्या निवडणुकीपासून काही ना काही शिकत आले आहेत. मतदार आता अधिक जागरुक झाले आहेत.देशाची अखंडता, एकता, विकास आणि पारदर्शकतेला ते मतदान करू लागले आहेत. तेव्हा निवडणुकीत त्यांना आता फसवता येऊ शकत नाही. ही बाब सर्वच राजकीय पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे, असा इशाराही त्यांनी दिला. २५ दिवसीय शिबिरात देशभरातील ८२८ स्वयंसेवक सहभागी झाले.पश्चिम बंगालची परिस्थिती देशासाठी घातकनिवडणुकीमध्ये स्पर्धा असते. निवडून येण्यासाठी बरेच काही बोलले जाते. परंतु निवडणूक संपली की स्पर्धा संपते. संसदेत निवडून येणाºया सर्वपक्षीय लोकांनी देशासाठी मिळून काम करायचे असते. जिंकणाºयाने गुर्मीत राहिले आणि हरणाºयाने संतापात राहिले तर देशाचे काय होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्या तेच सुरू आहे. खुर्चीचा मोहभंग किती हादरवून सोडतो. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली भाषा यायला हवी, अशी भाषा योग्य नाही. देशासाठी हे घातक आहे, असे ते म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही दिला होता इशाराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत सांगितले होते की, आपल्या देशाला कुणी ताकदीच्या जोरावर जिंकले नाही, तर आपण आपसात लढल्यामुळेच त्यांना आपल्याला जिंकता आले, हा इतिहास आहे, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ