शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:22 IST

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय संस्थांमध्ये खाद्यपदार्थांमधील तेल आणि साखरेचे प्रमाण सांगणारे बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.

Union Health Ministry on Junk Food: भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय समोसे, जिलेबी आणि लाडू यांसारख्या अन्न उत्पादनांवर हानिकारक असल्याचा इशारा देणारे लेबल लावणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता हा दावा खोटा असल्याचे समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या अन्न उत्पादनांवर कोणतेही चेतावणी लेबल लावले जाणार नसल्याचे म्हटलं आहे. समोसे, जिलेबी आणि लाडू यांसारख्या अन्नपदार्थांवर हानिकारक असल्याचा इशारा देणारे लेबल लावण्याचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे भारतीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. 

जिलेबीचा गोडवा आणि समोशाच्या तिखटपणासोबतच, आरोग्यविषयक इशारा देण्यात येणार असल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. सिगारेट, तंबाखूसारखे समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार असल्याचे समोर आलं होतं. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि युवकांमध्ये आवश्यकतेपेक्षा वाढणारे वजन यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जंक फूडवर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली होती. त्यानंतर आता केंद्राने समोसे, जिलेबी किंवा लाडू यांसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थासाठी कोणतेही इशारा देणारे लेबल लावणार नसल्याचे म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना लेबल लावण्याचा कोणताही निर्णय नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वतंत्रपणे कामाच्या ठिकाणी निरोगी गोष्टींच्या निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी सल्ला देणारा एक ऑईल बोर्ड जारी केला होता. लॉबी, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बैठक कक्ष इत्यादी ठिकाणी असे बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला. जेणेकरून विविध अन्नपदार्थांमधील लपलेले फॅट आणि साखरेच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण होईल, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी म्हटलं.

दरम्यान, भारतात लठ्ठपणाचा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, २०५० पर्यंत ४४.९ कोटी भारतीय लठ्ठ असतील. त्यानंतर, भारत या बाबतीत फक्त अमेरिकेच्या मागे असेल. सध्या, शहरी भागातील प्रत्येक पाचवा प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाशी झुंजत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी शारीरिक हालचालींमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असून हे आकडे चिंताजनक आहेत. आरोग्य मंत्रालयाचे हे पाऊल खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे बोर्ड  फक्त इशारे देणार नाहीत तर लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल विचार करण्याची संधी देखील देतील. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य