शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
4
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
5
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
6
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
7
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
8
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
9
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
10
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
11
"लोकशाहीचे वस्त्रहरण, १७ ईव्हीएम मशिनचे सील तोडून पुन्हा मतदान पण अद्याप गुन्हा दाखल नाही"
12
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
13
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
15
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
16
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
17
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
18
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
19
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
20
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
Daily Top 2Weekly Top 5

समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:22 IST

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय संस्थांमध्ये खाद्यपदार्थांमधील तेल आणि साखरेचे प्रमाण सांगणारे बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.

Union Health Ministry on Junk Food: भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय समोसे, जिलेबी आणि लाडू यांसारख्या अन्न उत्पादनांवर हानिकारक असल्याचा इशारा देणारे लेबल लावणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता हा दावा खोटा असल्याचे समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या अन्न उत्पादनांवर कोणतेही चेतावणी लेबल लावले जाणार नसल्याचे म्हटलं आहे. समोसे, जिलेबी आणि लाडू यांसारख्या अन्नपदार्थांवर हानिकारक असल्याचा इशारा देणारे लेबल लावण्याचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे भारतीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. 

जिलेबीचा गोडवा आणि समोशाच्या तिखटपणासोबतच, आरोग्यविषयक इशारा देण्यात येणार असल्याची चर्चा देशभरात सुरु आहे. सिगारेट, तंबाखूसारखे समोसा आणि जिलेबीवर ग्राहकांना इशारा देणारी सूचना छापली जाणार असल्याचे समोर आलं होतं. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि युवकांमध्ये आवश्यकतेपेक्षा वाढणारे वजन यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जंक फूडवर इशारा देणारी सूचना लावण्याची तयारी केली होती. त्यानंतर आता केंद्राने समोसे, जिलेबी किंवा लाडू यांसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थासाठी कोणतेही इशारा देणारे लेबल लावणार नसल्याचे म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले की, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना लेबल लावण्याचा कोणताही निर्णय नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वतंत्रपणे कामाच्या ठिकाणी निरोगी गोष्टींच्या निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी सल्ला देणारा एक ऑईल बोर्ड जारी केला होता. लॉबी, कॅन्टीन, कॅफेटेरिया, बैठक कक्ष इत्यादी ठिकाणी असे बोर्ड लावण्याचा सल्ला देण्यात आला. जेणेकरून विविध अन्नपदार्थांमधील लपलेले फॅट आणि साखरेच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण होईल, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी म्हटलं.

दरम्यान, भारतात लठ्ठपणाचा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, २०५० पर्यंत ४४.९ कोटी भारतीय लठ्ठ असतील. त्यानंतर, भारत या बाबतीत फक्त अमेरिकेच्या मागे असेल. सध्या, शहरी भागातील प्रत्येक पाचवा प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाशी झुंजत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी शारीरिक हालचालींमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असून हे आकडे चिंताजनक आहेत. आरोग्य मंत्रालयाचे हे पाऊल खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे बोर्ड  फक्त इशारे देणार नाहीत तर लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल विचार करण्याची संधी देखील देतील. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारHealthआरोग्य