शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:11 IST

भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, एकदा नियम ठरवले जातात.ते पुन्हा मध्येच दलले जाऊ शकत नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकरी भरतीच्या नियमांबोबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 'सरकारी नोकऱ्यांसाठी भरतीचे नियम आधीपासून जे ठरवले आहेत, त्यात बदल करता येणार नाही, असं न्यायलयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, एकदा भरतीचे नियम ठरवले जातात, ते पुन्हा बदलले जाऊ शकत नाहीत. निवडीचे नियम अनियंत्रित नसावेत पण ते घटनेच्या कलम १४ नुसार असावेत. 

सर्वोच्च न्यायालयाने एकमताने सांगितले की, पारदर्शकता आणि भेदभाव न करणे हे सार्वजनिक भरती प्रक्रियेचे वैशिष्ट्य असले पाहिजे. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, न्यायमूर्ती पीएस नरसिंहा, न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही या घटनापीठात समावेश होता.

यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."

या निर्णयामागील प्रकरण राजस्थान उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. २०१३ मध्ये अनुवादक पदाच्या भरतीदरम्यान, राज्य सरकारने काही नियमांमध्ये बदल केले होते, यामध्ये असे म्हटले होते की, केवळ तेच उमेदवार नियुक्तीसाठी पात्र मानले जातील ज्यांनी लेखी आणि तोंडी ७५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. आधीच परीक्षा दिलेल्या उमेदवारांवर हा निर्णय लागू करण्यात आल्याने भरती प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता.

सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, यासाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि न्याय्य असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले. मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय, न्यायमूर्ती पमीघंटम नरसिंहा, न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती मनोज कुमार मिश्रा यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने कोणत्याही भरती प्रक्रियेच्या मध्यभागी उमेदवारांची पात्रता किंवा पात्रता बदलणे समर्थनीय नाही, असं म्हंटले आहे.

कोणत्याही भरती प्रक्रियेत, प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जे नियम लागू होते तेच नियम सरकारने पाळले पाहिजेत, असेही या निर्णयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे उमेदवारांचे हक्क आणि निःपक्षपातीपणाचे रक्षण करण्याचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे. भरतीमध्ये पारदर्शकता असावी, जेणेकरून पक्षपात किंवा अनियमितता होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयjobनोकरी