शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

दररोज 50 लाख जणांना रोजगार देणार यूपी सरकार; योगींची योजना होतेय तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:10 IST

मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे

लखनौ - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशल श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. गावी पोहोचल्यानंतर आता करायचे काय, असा प्रश्न वाटेत चालतानाच या मजूरांच्या मनात भेडसावत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मजुरांच्या प्रश्नावर उत्तर शोधले आहे.  

मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि इतर राज्यातून अद्यापही हजोर मजूर पायीच आपल्या गावाकडं जाताना दिसत आहेत. त्यात, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणऱ्या मजुरांची संख्या लक्षणीय आहे. लाखो मजूर आता आपल्या गावी पोहोचल आहेत, पोहोचत आहेत. तर, आता मुंबईत जायचं नको, असेही अनेकांनी ठरवलंय. मात्र, भविष्याचा मोठा प्रश्न या मुजरांपुढे उभा राहिला आहे. गावी जाऊन करायचं काय, पोट भरायचं कसं, हीच काळजी त्यांना भेडसावत आहे. त्यामुळेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मजुरांच्या रोजगारासाठी एक योजना आखायला सुरुवात केली आहे. 

या महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात १ कोटी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेशच योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. ग्रामीण भागात रोजगारनिर्मित्तीसाठी मनरेगा सर्वात प्रभावी उपक्रम असल्याचं योगींनी म्हटलं आहे. २३ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आपण ५० लाख रोजगार निर्मित्ती काही वेळेत करणे आवश्यक आहे. सध्या अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे, हेच सर्वात मोठे कार्य आहे. त्यासाठी, प्रत्येक ग्रामसेवकाने मजबुतीने आणि जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. योगी आदित्यनाथ यांनी सरकारी बंगल्यावर जवळपास ३५ हजार ८१८ ग्रामसेवकांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून २२५.३९ कोटींची रक्कम जमा केले आहेत. 

राज्यात एमएसएमईद्वारे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यांसदर्भात योगी आदित्यानाथ यांनी व्हिडिओ कॉन्फेरेन्सिंगद्वारे अनेक उद्योजकांशी संवादही साधला. दरम्यान, मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १५ मजूरांचा मृत्यू झाला. या घटनेनं देशातील मजूरांच्या स्थलांतराचे भीषण वास्तव जगासमोर आले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथEmployeeकर्मचारीjobनोकरीMigrationस्थलांतरणcorona virusकोरोना वायरस बातम्या