शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus: आणखी एका संकटाची चाहूल; चीनला रोखण्यासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:59 IST

एफडीआय धोरणात बदल; कोरोना स्थितीचा गैरफायदा टाळण्यासाठी निर्णय

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा गैरफायदा घेऊन कोणीही भारतीय कंपन्यांवर ताबा मिळवू नये किंवा त्यांचे हस्तांतरण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणामध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भारताच्या सीमेला लागून असलेल्या देशातील कंपनी किंवा नागरिकाला गुंतवणूक करायची असेल तर ती ते केवळ केंद्र सरकारच्या देखरेखीखाली व सरकारी प्रक्रियेद्वारेच करू शकतात.यासंदर्भात केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, कोणतीही अनिवासी कंपनी प्रतिबंधित क्षेत्र किंवा उपक्रम वगळता थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार भारतात गुंतवणूक करू शकते. पण जर भारतातील गुंतवणूकीचा लाभार्थी मालक शेजारी देशात राहात असेल किंवा तेथील नागरिक असेल वा त्या देशातील कंपनी ही गुंतवणूक करत असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातूनच ही प्रक्रिया पार पाडता येईल. याशिवाय, पाकिस्तानातील नागरिक किंवा पाकिस्तानमध्ये नोंदणीकृत कंपनी ही संरक्षण, अंतराळ, आण्विक ऊर्जा आणि परकीय गुंतवणुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र/उपक्रम ही क्षेत्रे वगळता अन्य कंपन्यांत केवळ सरकारी मार्गाने गुंतवणूक करू शकतात.गुंतवणुकीस सरकारची मान्यता आवश्यककोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विदेशातील कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने २०१७ सालच्या थेट परकीय गुंतवणूक धोरणाचा फेरआढावा घेतल व त्यात काही बदल केले. त्यानुसार लाभार्थींच्या मालकीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही कंपनीकडे थेट परकीय गुंतवणुकीमुळे हस्तांतरण होणार असल्यास त्या बदलांसाठी केंद्र सरकारची मान्यता आवश्यक असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनFDIपरकीय गुंतवणूक