शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
5
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
6
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
7
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
8
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
9
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
10
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
11
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
12
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
13
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
14
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
15
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
16
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
17
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
18
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
19
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
20
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात सरकारी कर्मचारी; ५८ वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 08:44 IST

गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या धोरणांवर आरएसएसकडून टीका होत असल्यानं भाजपा आणि आरएसएस यांच्यातील संबंध ताणल्याची चर्चा होती. त्यातच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारनंराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी ५८ वर्षांपूर्वी घातलेले निर्बंध हटवले आहेत. आता सरकारी कर्मचारी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. ३० नोव्हेंबर १९६६, २५ जुलै १९७० आणि २८ ऑक्टोबर १९८० साली संबंधित कार्यालयांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख निर्बंधातून वगळण्यात यावा असा आदेश सरकारने दिला आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेसनं जोरदार विरोध केला आहे. रविवारी काँग्रेसनं केंद्राच्या या निर्णयावर टीका केली आहे. ज्यात आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत ६ दशकांपूर्वी लावलेले निर्बंध हटवण्यात आले आहेत. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी म्हटलं की, फेब्रुवारी १९४८ मध्ये गांधींजींची हत्या झाल्यानंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर निर्बंध लावले होते. त्यानंतर चांगल्या वर्तवणुकीच्या अटीवर हे निर्बंध हटवले गेले. तरीही आरएसएसनं नागपूरच्या मुख्यालयात कधीही तिरंगा फडकवला नाही. १९६६ मध्ये आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यावर निर्बंध लावले होते हा निर्णय योग्यही होता असं त्यांनी सांगितले.

१९६६ मध्ये जारी केलेला आदेश हा अधिकृत होता. ४ जून २०२४ नंतर स्वयंभू नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आणि आरएसएसमधील संबंध ताणले गेलेत. ९ जुलै २०२४ ला ५८ वर्षापूर्वी घातलेले निर्बंध हटवण्यात आले, जे अटलबिहारी वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यकाळातही लागू होते असंही जयराम रमेश म्हणाले. तर ५८ वर्षापूर्वी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध लावले होते परंतु मोदी सरकारनं हा आदेश रद्द केला असं सांगत काँग्रेसचे अन्य नेते पवन खेडा यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

घटनाबाह्य आदेश रद्द - भाजपा

५८ वर्षांपूर्वी १९६६ मध्ये जारी केलेला घटनाबाह्य आदेश मोदी सरकारकडून रद्द केला आहे. या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध लावण्यात आले होते असं भाजपा नेते अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा