शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सरकारकडे बेरोजगारांची आकडेवारीच नाही, श्रीकांत शिंदेंचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 01:13 IST

बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.ते म्हणाले, जागतिक बँकेच्या अहवालानुसार दरवर्षी दीड कोटी लोक जॉब मार्केटमध्ये प्रवेश करतात; पण सरकारकडे रोजगाराची आकडेवारीच नाही. पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या हिशेबाने आज साडेचार वर्षांनंतर ९ कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता. वाढत्या बेरोजगारीमुळे मॉब लिंचिंगचे प्रकार होत असल्याचे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीच म्हटल्याची आठवण शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला करून दिली.त्यांचे आरक्षण काढाअनेक पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचा सामाजिक स्तर उंचावला आहे. तो तपासून त्या-त्या जातींचे आरक्षण कमी करण्याची मागणी उस्मानाबादचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे सुरू असलेल्या वादाचा संदर्भ त्यांनी दिला. एससी, एसटी, ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे गायकवाड म्हणाले.खºया‘अनुसूचित जमाती’लाभापासून वंचितअनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक सामान्य जातींमधील विद्याथ्याचा ‘एसटी’ संवर्गात समावेश केला जात आहे. त्यामुळे खºया अनुसूचित जमातीतील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार दिंडोरीचे हरिंश्चद्र चव्हाण यांनी केला. राजकीय दबावापोटी हा प्रकार होत आहे. आदिवासींच्या नावाखाली भलत्यांनाच नोकºया मिळत आहेत, असे ते म्हणाले.स्वामिनाथन आयोगधानासाठी महाराष्ट्र सरकारने ३ हजार २५० रूपये भाव देण्याची मागणी केली होती. केंद्राने १५५० रूपये भाव दिला. कापसासाठी ७ हजार २०४ रूपये मागितले असताना साडेचार हजार रूपये दिले.ही तफावत टाळण्यासाठी 'सी-२' प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात ११ हजार ९५० शेतकºयांनी आत्महत्या केल्या.वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठीएमएसपी निश्चित करण्यात आली असली तरी ते न्यूनतम समर्थन मूल्यावरच निश्चित होते. त्यामुळे स्वामिनाथन आयोगाची ‘सी २’ शिफारस मान्य करावी, असे त्या म्हणाल्या.जहाजबांधणीतील बेरोजगारीत वाढजहाजबांधणी क्षेत्रात सातत्याने वाढणाºया बेरोजगारीकडे मुंबईचे अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले. लेबर कन्व्हेन्शननुसार या क्षेत्रातील कर्मचाºयांना दरमहा ६१४ डॉलर्स मिळायला हवेत. पण १०५ डॉलर्स अर्थात सात हजार रूपय देण्यात येतात. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांमध्ये अस्वस्थता आहे, असे सावंत म्हणाले. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१० साली सी फेरर्सची संख्या ६२ हजार २१४ होती. सात वर्षांत ती १ लाख ५४ हजारांवर पोहोचली. देशात १५७ प्रशिक्षण संस्था आहे, तर संस्थांचे कॅपेसिटी युटिलायझेशन ७० टक्के आहे. त्यात वाढ करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

टॅग्स :ParliamentसंसदShrikant Shindeश्रीकांत शिंदे