शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

सरकारकडे बेरोजगारांची आकडेवारीच नाही, श्रीकांत शिंदेंचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 01:13 IST

बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.ते म्हणाले, जागतिक बँकेच्या अहवालानुसार दरवर्षी दीड कोटी लोक जॉब मार्केटमध्ये प्रवेश करतात; पण सरकारकडे रोजगाराची आकडेवारीच नाही. पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या हिशेबाने आज साडेचार वर्षांनंतर ९ कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता. वाढत्या बेरोजगारीमुळे मॉब लिंचिंगचे प्रकार होत असल्याचे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीच म्हटल्याची आठवण शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला करून दिली.त्यांचे आरक्षण काढाअनेक पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचा सामाजिक स्तर उंचावला आहे. तो तपासून त्या-त्या जातींचे आरक्षण कमी करण्याची मागणी उस्मानाबादचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे सुरू असलेल्या वादाचा संदर्भ त्यांनी दिला. एससी, एसटी, ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे गायकवाड म्हणाले.खºया‘अनुसूचित जमाती’लाभापासून वंचितअनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक सामान्य जातींमधील विद्याथ्याचा ‘एसटी’ संवर्गात समावेश केला जात आहे. त्यामुळे खºया अनुसूचित जमातीतील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार दिंडोरीचे हरिंश्चद्र चव्हाण यांनी केला. राजकीय दबावापोटी हा प्रकार होत आहे. आदिवासींच्या नावाखाली भलत्यांनाच नोकºया मिळत आहेत, असे ते म्हणाले.स्वामिनाथन आयोगधानासाठी महाराष्ट्र सरकारने ३ हजार २५० रूपये भाव देण्याची मागणी केली होती. केंद्राने १५५० रूपये भाव दिला. कापसासाठी ७ हजार २०४ रूपये मागितले असताना साडेचार हजार रूपये दिले.ही तफावत टाळण्यासाठी 'सी-२' प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात ११ हजार ९५० शेतकºयांनी आत्महत्या केल्या.वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठीएमएसपी निश्चित करण्यात आली असली तरी ते न्यूनतम समर्थन मूल्यावरच निश्चित होते. त्यामुळे स्वामिनाथन आयोगाची ‘सी २’ शिफारस मान्य करावी, असे त्या म्हणाल्या.जहाजबांधणीतील बेरोजगारीत वाढजहाजबांधणी क्षेत्रात सातत्याने वाढणाºया बेरोजगारीकडे मुंबईचे अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले. लेबर कन्व्हेन्शननुसार या क्षेत्रातील कर्मचाºयांना दरमहा ६१४ डॉलर्स मिळायला हवेत. पण १०५ डॉलर्स अर्थात सात हजार रूपय देण्यात येतात. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांमध्ये अस्वस्थता आहे, असे सावंत म्हणाले. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१० साली सी फेरर्सची संख्या ६२ हजार २१४ होती. सात वर्षांत ती १ लाख ५४ हजारांवर पोहोचली. देशात १५७ प्रशिक्षण संस्था आहे, तर संस्थांचे कॅपेसिटी युटिलायझेशन ७० टक्के आहे. त्यात वाढ करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

टॅग्स :ParliamentसंसदShrikant Shindeश्रीकांत शिंदे