शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारचे निर्गुंतवणूक धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 4:25 AM

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र व अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली व या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र व अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली व या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. एकेकाळी या सरकारी कंपन्यांची संख्या ३८०पर्यंत पोहोचली होती. या प्रयोगाचा परिणाम म्हणून भारताची अर्थव्यवस्था १९९०च्या दशकापर्यंत कधीही ३ टक्क्यांपेक्षा अधिक दराने वाढली नाही. १९९१मध्ये अर्थमंत्री असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी खुल्या बाजार व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यामुळे सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडू लागल्या. त्यांना स्पर्धाक्षम बनवण्याचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर, या कंपन्या खासगी कंपन्यांना विकण्याचे म्हणजे निर्गुंतवणूक धोरण आले.कंपन्यांचे बाजारमूल्य घसरलेगेल्या पाच वर्षांत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर निर्गुंतवणुकीतून मिळणारा निधी अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी वापरला जाऊ लागल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या केंद्र सरकारजवळ कोणतेच निश्चित आर्थिक धोरण नसल्याने, निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एका सरकारी कंपनीकडून दुसऱ्या सरकारी कंपनीचे अधिग्रहण करण्याचे प्रकारही सुरूझाले. मुळात कंपनीची मालकी सरकारकडेच शिल्लक राहत असल्याने याला निर्गुंतवणूक म्हणावे की नाही, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करीत आहेत.याचे उत्कृष्ट उदाहरण ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ओएनजीसी), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) व गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन (जीएसपीसी) या दोन कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. ओएनजीसीने एचपीसीएल तब्बल ३६,९१५ कोटीत खरेदी केली, तर जीएसपीसीसाठी चक्क १९,००० कोटी मोजले. याचा परिणाम म्हणून ओएनजीसीचा राखीव निधी ९,५०० कोटींवरून फक्त १६७ कोटी झाला, तर कर्ज १,३०० कोटींवरून २५,५९२ कोटींपर्यंत वाढले. बाजारमूल्य ३.५० लाख कोटींवरून २.२० लाख कोटींपर्यंत घसरले. २०१८-१९ या एका वर्षात हे घडले आहे.१५ कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून मिळाले ७७,४१७ कोटी२०१८ ते २०२० या दोन आर्थिक वर्षात सरकारला एकूण ४० सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करायची होती. यापैकी सन २०१८-१९मध्ये १५ कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून सरकारला ८४ हजार ९७२ कोटी रुपये येणे अपेक्षित होते. पण ७७ हजार ४१७ कोटी रुपये मिळाले. निर्गुंतवणूक करण्यात आलेल्या १५ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट अ‍ॅण्ड एएमपी डेव्हलपमेंट इंडिया लि., हिंदुस्थान प्रीफॅब लि., इंजिनीअरिंंग प्रोजेक्टस् (इं.) लि., ब्रीज अ‍ॅण्ड रुफ कंपनी इंडिया लि., पवनहंस लि., हिंदुस्थान न्यूजप्रिंट लि. (साहाय्यक कंपनी), स्कूटर्स इंडिया लि., भारत अर्थ मूव्हर्स लि., भारत पंप अ‍ॅण्ड एएमपी कॉम्प्रेसर्स लि., हिंदुस्थान फ्लुसो कार्बन लि. (साहाय्यक कंपनी), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि., फेरो स्क्रॅप निगम लि. (साहाय्यक कंपनी), सिमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि., नग्मार स्टील प्लॅण्ट (एनएमडीसी), अलॉय स्टील प्लॅण्ट आदींचा समावेश आहे. या कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण झाल्याने सरकारची मालकी संपली आहे.सध्या जीडीपीची वाढ ४.५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पण ही परिस्थिती पुढे राहणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आठ मोठी पावले उचलली आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल आणि अर्थव्यवस्था पुन्हा सुस्थितीत येण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.भविष्यात सकारात्मक परिणाम दिसणार : सरकारजवळ आर्थिक धोरण नसल्याने या कंपन्यांचे भवितव्य खासगी क्षेत्राकडे जाईल का व निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईल का, हा मोठा प्रश्न उभा झाला आहे. निर्गुंतवणुकीमुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम दिसून येणार आहे. पण निर्गुंतवणुकीचे भविष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी वाढणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.सरकार कंपन्यांमधील हिस्सा कमी करणारकेंद्र सरकार निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून १.०५ लाख कोटी रुपये मिळविण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्याअंतर्गत सरकारने नुकतीच भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लि.ने (बीपीसीएल) सरकारी कंपन्यांच्या भागभांडवलला विक्रीस मान्यता दिली आहे. याशिवाय सरकार अनेक कंपन्यांमधील हिस्सा कमी करणार आहे. चालू आर्थिक वर्षात निर्गंुतवणुकीतून सरकारला आतापर्यंत जवळपास १७,००० कोटी रुपये मिळाले आहेत.चार बलाढ्य कंपन्यांची होणार निर्गुंतवणूकआता २०१९-२०मध्ये सरकारने रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन (आरईसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टेक्निकल कंपनी (आयआरसीटीसी) व एअर इंडिया या बलाढ्य कंपन्यांचे निर्गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. पुढे-मागे भारत संचार निगम लि.चीही (बीएसएनएल) निर्गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. सरकारने सन २०१९-२०मध्ये कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून १ लाख ५ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सरकारचा गुंतवणूक व सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभाग (डीआयपीएएम) करीत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया