शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

मोठी बातमी : सरकारने रद्द केली तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशनकार्ड

By बाळकृष्ण परब | Updated: November 9, 2020 09:08 IST

Ration Cards News : सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्याच्या परिचालनामध्ये पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.

ठळक मुद्देअन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एनएफएसएच्या अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी २०१३ पासून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केली रद्द करण्यात आलेल्या रेशनकार्डच्या बदल्यात खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना किंवा कुटुंबांना नियमित पद्धतीने रेशनकार्ड जारी करण्यात आली आहेतसध्या देशातील ८० कोटींहून अधिक लोकांना केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेले धान्य खरेदी करतात

नवी दिल्ली - अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एनएफएसएच्या अंतर्गत योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी २०१३ पासून तब्बल ४ कोटी ३९ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केली आहेत. रद्द करण्यात आलेल्या रेशनकार्डच्या बदल्यात खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यांना किंवा कुटुंबांना नियमित पद्धतीने रेशनकार्ड जारी करण्यात आली आहेत. देशभरात तंत्रज्ञानाच्या मदतीने पीडीएस सुधारणा करण्यासाठी लक्षित अभियानांतर्गत एनएफएसए लागू करण्याची तयारी सुरू आहे. त्यादरम्यान, सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्याच्या परिचालनामध्ये पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.रेशन कार्ड आणि लाभार्थ्यांच्या डाटाबेसचे डिजिटायझेशन केल्यानंतर तसेच त्याला आधारकार्डशी जोडण्यात आल्यानंतर अपात्र किंवा बोगस रेशनकार्डची ओळख पटवल्यानंतर डिजिटाइज केलेल्या डेटामधील पुनरावृत्ती टाळून तसेच लाभार्थ्यांचे स्थलांतर किंवा मृत्यूच्या प्रकरणांची खातरजमा करून राज्य आमि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी २०१३ ते २०२० पर्यंत देशभरातील ४ लाख ३९ हजार रेशन कार्ड रद्द करण्यात आली आहेत.याशिवाय एनएफएसए कव्हरेजचा जारी करण्यात आलेला संबंधित कोटा, संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियमितपणे एनएफएसए अंतर्गत लाभार्थ्यांची योग्य ओळख पटवण्यासाठी वापरण्यात येत आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना आणि कुटुंबांचा अंतर्भाव करण्याचे आणि त्यांना नवे रेशनकार्ड देण्याचे काम सुरू आहे. हे काम अधिनियमांतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी परिभाषित कव्हरेजच्या संबंधित मर्यादेच्या अंतर्गत केले जात आहे.

एनएफएसएच्या अंतर्गत टीपीडीएसच्या माध्यमातून ८१ कोटी ३५ लाख लोकांना अत्यंत माफक किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देत आहे. २०११च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येनुसार ही संख्या दोन तृतियांश एवढी आहे. सध्या देशातील ८० कोटींहून अधिक लोकांना केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेले धान्य खरेदी करतात.

टॅग्स :foodअन्नCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत