शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संसदीय व्यवस्थेवर सरकार हल्ले करतेय : सोनिया गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:51 IST

नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकार संसदीय व्यवस्थेवर हल्ले करून लोकशाही संस्थांना दुबळे करीत आहे. मोदी सरकार अहंकारी असून त्याची सावली संसदीय लोकशाहीवर पडल्याचे दिसते, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सरकारवर हल्ला चढवला.त्या म्हणाल्या की, भ्रष्टाचार, मंत्र्यांकडून पदाचा होत असलेला दुरुपयोग आणि संरक्षण साहित्य खरेदीचे प्रश्न विचारले जातील व उत्तरे द्यावी लागतील. त्यामुळेच सरकार संसदेलाच टाळत आहे.सोनिया गांधी म्हणाल्या की, सदोष जीएसटीसाठी मोदी अर्ध्या रात्री संसदेचे विशेष अधिवेशन बोलवतात. परंतु, आज संसदेला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. बेकारी वाढत आहे, महागाईने कळस गाठला आहे, निर्यात घटली आहे व जीएसटीमुळे लोक त्रासून गेले आहेत. नोटाबंदीमुळे लोकांच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे. आमचे पंतप्रधान मोठ्या घोषणा करून खोट्या आश्वासनांनी लोकांनी फसवणूक करीत आहेत. वस्तुस्थिती ही आहे की मोदी यांच्या या उपायांचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही.>जेटली यांचे सोनियांना प्रत्युत्तरसोनिया गांधी यांच्या या आरोपांना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी उत्तर देताना २०११ मध्ये संसद अधिवेशनाला विलंब झाला होता कारण निवडणुकीच्या तारखा त्याचवेळी आल्या होत्या, असे म्हटले. निवडणुकांमुळे यापूर्वीही अनेकवेळा संसदेचे अधिवेशन पुढे ढकलले गेले होते. संसदेचे अधिवेशन सुरू होईल तेव्हा काँग्रेसचे खरे रूप उघड होईल, असे जेटली म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा