शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत मिळाले, मुख्यमंत्रीही ठरले, तरीही चार राज्यात शपथविधीला का होतोय उशीर? समोर आलं असं कारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:53 IST

BJP News: पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चार राज्यांमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटत आला आहे. मात्र तरीही या चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.

नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चार राज्यांमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटत आला आहे. मात्र तरीही या चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा शपथविधी पुढे ढकलण्यामागचं कारण समोर आलं आहे. 

या राज्यांमध्ये सत्तेवर आलेल्या भाजपामधील अनेक नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे. १७ मार्च रोजी होलाष्टक आहे. भारतीय रीती-रिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार होलाष्टक हे अशुभ मानले जाते.वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार होलाष्टकानंतरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यामध्ये भाजपा सरकार स्थापनेला हिरवा झेंडा दाखवू शकते.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, गोव्यामध्ये प्रमोद सावंत आणि मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे निश्चित आहे. मात्र उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र होलाष्टक संपल्यानंतर या चारही राज्यांमध्ये सरकारांचा शपथविधी होणार हे निश्चित आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित होऊनही अशुभ काळ असल्याने मुख्यमंत्र्यांच्या नावांची अधिकृत घोषणाही भाजपाकडून केली जात नाही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी होत असलेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

होळीचा सण हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. योगी आदित्यनाथ यांचे विधानसभा क्षेत्र असलेल्या गोरखपूरमध्ये १९ मार्च रोजी होळीची समाप्ती होईल. तर गोव्यामध्ये अजून काही दिवस होळी खेळली जाते. त्यामुळे होळीच्या सणाची समाप्ती पाहून शपथग्रहणाची तारीख निश्चित केली जाईल. मणिपूरमध्ये होळीचा सण योगांस उत्सवासह खेळला जातो. तो पाच दिवसांपर्यंत चालतो. तो १५ व्या शतकातील संत चैतन्य महाप्रभूंच्या जयंती दिनी समाप्त होतो. त्यामुळे मणिपूरमध्ये आमदारांनी शपथ घेतली आहे. मात्र होळीच्या उत्सवानंतरच तिथे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवाChief Ministerमुख्यमंत्री