शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बहुमत मिळाले, मुख्यमंत्रीही ठरले, तरीही चार राज्यात शपथविधीला का होतोय उशीर? समोर आलं असं कारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:53 IST

BJP News: पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चार राज्यांमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटत आला आहे. मात्र तरीही या चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.

नवी दिल्ली - पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चार राज्यांमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटत आला आहे. मात्र तरीही या चार राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झाले आहे. मात्र शपथविधी पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा शपथविधी पुढे ढकलण्यामागचं कारण समोर आलं आहे. 

या राज्यांमध्ये सत्तेवर आलेल्या भाजपामधील अनेक नेत्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे. १७ मार्च रोजी होलाष्टक आहे. भारतीय रीती-रिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार होलाष्टक हे अशुभ मानले जाते.वर्तवण्यात येत असलेल्या अंदाजानुसार होलाष्टकानंतरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यामध्ये भाजपा सरकार स्थापनेला हिरवा झेंडा दाखवू शकते.

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ, गोव्यामध्ये प्रमोद सावंत आणि मणिपूरमध्ये बीरेन सिंह हे पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे निश्चित आहे. मात्र उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र होलाष्टक संपल्यानंतर या चारही राज्यांमध्ये सरकारांचा शपथविधी होणार हे निश्चित आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित होऊनही अशुभ काळ असल्याने मुख्यमंत्र्यांच्या नावांची अधिकृत घोषणाही भाजपाकडून केली जात नाही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी होत असलेल्या विलंबामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.

होळीचा सण हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. योगी आदित्यनाथ यांचे विधानसभा क्षेत्र असलेल्या गोरखपूरमध्ये १९ मार्च रोजी होळीची समाप्ती होईल. तर गोव्यामध्ये अजून काही दिवस होळी खेळली जाते. त्यामुळे होळीच्या सणाची समाप्ती पाहून शपथग्रहणाची तारीख निश्चित केली जाईल. मणिपूरमध्ये होळीचा सण योगांस उत्सवासह खेळला जातो. तो पाच दिवसांपर्यंत चालतो. तो १५ व्या शतकातील संत चैतन्य महाप्रभूंच्या जयंती दिनी समाप्त होतो. त्यामुळे मणिपूरमध्ये आमदारांनी शपथ घेतली आहे. मात्र होळीच्या उत्सवानंतरच तिथे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशgoaगोवाChief Ministerमुख्यमंत्री