शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

विस्तारवादाचा गेला काळ, ही विकासवादाची वेळ! मोदींचा लेहमधून चीनला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 15:27 IST

लडाखमधून लष्करातील जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनलाही थेट इशारा दिला. विस्तारवादी धोरण राबवण्याचा काळ आता गेला आहे. आता विकासवादाची वेळ आहे, असा टोला मोदींनी चीनला लगावला. आ

लेह (लडाख) - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक लेहचा दौरा केला. मोदींच्या या दौऱ्यामुळे चीनसह अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत. दरम्यान, लडाखमधून लष्करातील जवानांशी संवाद साधताना मोदींनी चीनलाही थेट इशारा दिला. विस्तारवादी धोरण राबवण्याचा काळ आता गेला आहे. आता विकासवादाची वेळ आहे, असा टोला मोदींनी चीनला लगावला.

आज सकाळी पंतप्रधान मोदी धक्कातंत्राचा वापर करत थेट लेहमध्ये दाखल झाले. या भेटीवेळी मोदींनी लष्कर आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच गलवानमधील चकमकीत जखमी झालेल्या जवानांचीही मोदींनी भेट घेतली. त्यानंतर मोदींनी लेहमध्ये जवानांना संबोधित केले.

त्यावेळी मोदींनी भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक करतानाच चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली, ते म्हणाले की, विस्तारवादाचा काळ आता संपुष्टात आला आहे. आजची वेळ ही विकासवादाची आहे. वेगाने बदलत असलेल्या काळात विकासवादच प्रासंगिक आहे. विकासवादासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्याच विकासाचा आधार आहे. गेल्या शतकात विस्तारवादानेच मानवजातीचा विशान केला होता. त्यामुळे कुणीही विस्तारवादासाठी घेतलेली भूमिका ही जागतिक शांतीसाठी धोका ठरू शकते. अशा विस्तारवादी शक्ती संपुष्टात येतात, याला इतिहास साक्षीदार आहे, असा गर्भित इशाराही मोदींनी दिला.

यावेळी मोदींनी भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण देत चीनला इशारा दिला. आम्ही बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची पूजा करतो आणि सुदर्शन चक्र धारण केलेल्या श्रीकृष्णालाही पूजतो, असे मोदी म्हणाले. भारताच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील मोठ्य भूभागावर चीन दावा करत असतो. तसेच भारताशिवाय रशिया, भूतान, व्हिएतनाम आदी अनेक देशांच्या भूभागावर चीनकडून दावेदारी सांगण्यात येत असते.  

दरम्यान, आजच्या संबोधनावेळी मोदींनी गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याचेही कौतुक केले. ते म्हणाले की, देशवासियांना जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्र आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतीप्रिय असणे गरजेचं असतं. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणी आम्हाला डिवचलं तर, उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे म्हणत थेट सीमारेषेवरुनच मोदींनी चीनला स्पष्ट संदेश दिला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखIndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवान