शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

सोने वितळविण्याने भावनांनाच ठेच!

By admin | Updated: December 20, 2015 23:46 IST

देशात वापराविना पडून असलेले एक हजार अब्ज डॉलरचे सोने ‘सुवर्ण मौद्रिकरण’ योजनेंतर्गत बाजारात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी दिल्ली : देशात वापराविना पडून असलेले एक हजार अब्ज डॉलरचे सोने ‘सुवर्ण मौद्रिकरण’ योजनेंतर्गत बाजारात आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने मोठमोठे सुवर्णभंडार असलेल्या मंदिरावर नजर ठेवून ही योजना आखली असली तरी अनेक मंदिरांचे ट्रस्टी किंवा संचालकांनी सोने वितळविले जाणार असल्यामुळे धार्मिक भावनांना ठेच लागण्याचा मुद्दा उपस्थित करीत चिंता व्यक्त केली आहे.सरकारच्या सुवर्ण मौद्रिकरण योजनेत तत्काळ सहभाग नोंदविणे आमच्यासाठी कदाचित शक्य होणार नाही. ही योजना विचारात घेण्याजोगी असली तरी त्याबाबत अद्याप ठाम निर्णय घेतलेला नाही, असे काही मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. कुबेराचा खजिना मानले जाणारे केरळचे प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर, महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिर आणि अन्य काही मंदिरांबाबत कनिष्ठ न्यायालयात चालत असलेले मुद्दे मार्गात अडसर बनले आहेत. सिद्धिविनायक मंदिराची तयारी...मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने या योजनेत रुची दाखविली आहे. या मंदिराकडे असलेले १६० किलो सोन्याच्या भंडाराचा उपयोग करण्याच्या विविध पर्यांयावर विचार केला जात आहे. या मंदिराने सुमारे १० किलो सोने याआधीच बँकेकडे जमा केले आहे. प्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराच्या उच्चस्तरीय गुंतवणूक समितीने लवकरच बैठक आयोजित केली आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडातील कनकदुर्गाम्मा मंदिराने सहभागी होण्यावर विचार केलेला नाही.गुजरातमधील प्रसिद्ध अंबाजी मंदिराने तूर्तास या योजनेत सोने जमा करण्यास नकार दिला असला तरी सोमनाथ मंदिराने त्यासाठी एक प्रस्ताव तयार केला आहे. अंतिम निर्णय मंदिरांचे विश्वस्त घेतील. द्वारकाधीश मंदिराच्या न्यास समितीचे अध्यक्ष एच.के. पटेल यांनी ही योजना विचार करण्यायोग्य असल्याचे स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)अनेक भाविक मंदिरांना देवी- देवतांच्या नावावर सोने भेट देतात. दान केलेले सोन्याचे दागिने किंवा विविध आभूषणे वितळविताना सोन्याचा ऱ्हास होऊन मूल्य कमी होत असल्यामुळेही अनेक देवस्थानांनी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण मौद्रिकरण योजनेनुसार धार्मिक संस्था, अनेक ट्रस्ट किंवा घरांघरांमध्ये पडून असलेले २२ हजार टन सोने आर्थिक प्रवाहात आणण्याचा उद्देश होता. आभूषणांच्या स्वरूपातील सोने जमा केले जात असले तरी बँकाकडून सोने वितळवूनच त्याची शुद्धता आणि मूल्य निश्चित केले जाते.