शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या डोक्यातून कर्नाटक जाईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:50 IST

नेते करत आहेत दावा : आमदार फुटून राज्यात २0१९ पर्यंत होईल सत्तांतर

नवी दिल्ली : कर्नाटकात येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या डोक्यात अद्यापही सरकार स्थापन करण्याचा विचार डोकावत आहे. अमित शहा यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले असून, २0१९ पर्यंत कर्नाटकात सत्तांतर होईल, असे त्यांनी सोमवारी सांगितले.आम्हाला कर्नाटकात फार काही करायची गरज नाही. काँग्रेस व जनता दलाचे आमदारच आमचे काम करतील आणि तेथील सरकार कोसळेल, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यावेळी जनता दलाच्या मदतीने तुम्ही सरकार बनवाल का, असे विचारता शहा म्हणाले की, राजकारणात कायमस्वरूपी असे काहीच नसते. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे आताच सांगता येत नाही. कदाचित काँग्रेस व जनता दल या दोन्ही पक्षांतील आमदार फुटून वेगळा गट तेव्हा स्थापन करू शकतील.याचाच अर्थ भाजपाने कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे सोडून दिलेले नाही. तिथे आपले सरकार पुन्हा येईल, अशी खात्री अमित शहा व भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे. तसा विश्वास ते आपल्या कार्यकर्त्यांना वारंवार देत आहेत.कर्नाटकात काँग्रेस व जनता दल यांची आघाडी अनैतिक पायावर उभी असल्याचा आरोप अमित शहा यांनी आज केला. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेस व जनता दलाच्या आघाडीमुळे दोन्ही पक्षांचे काही आमदार खूष नाहीत. आमचे त्या आमदारांवर कायम लक्ष राहील. दुसरीकडे कुमारस्वामी सरकारवर आमचा सातत्याने दबाव राहील. ते सरकार काय पद्धतीने काम करते, हे आम्ही पाहू, प्रसंगी त्यांचा गोंधळ जनतेसमोर आणू आणि रस्त्यांवर संघर्षही करू. भाजपा येथे सरकार बनवू शकते, अशी आम्हाला खात्री वाटेल, त्यावेळी दोन्ही पक्षांचे काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील. आम्ही आजही काँग्रेस व जनता दलाच्या काही आमदारांशी संपर्क करुन आहोत. काँग्रेस व कुमारस्वामींच्या आघाडीबद्दल दोन्ही पक्षांत समाधान असे ते आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमच्याऐवजी ते आमदारच स्वत:च्या सरकारच्या विरोधात जात असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल, असे भाजपा नेता म्हणाला. लेकिन भाजपा अभी भी अमित शाह ने म्हणाले की काँग्रेस व जनता दल नेत्यांनी आपल्या सर्व आमदारांना जबरदस्तीने हॉटेलात बंदिस्त करून ठेवले आहे. ते जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा दोन पक्षांच्या अभद्र आघाडीबद्दल त्यांनाच उत्तरे द्यावी लागतील.आता जाऊ द्या की घरी!सध्या काँग्रेसचे आमदार एका हॉटेलात तर जनता दलाचे आमदार एका रिसॉर्टमध्ये आहेत. निवडून आल्यापासून ते घराबाहेर आहेत.विजयी झाल्यानंतर मतदारसंघात मिरवणुका काढायला त्यांना वेळही मिळाला नाही आणि कार्यकर्त्यांचे आभार मानणे शक्य झाले नाही.कार्यकर्ते सोडा, पण किमान मतदारांचे आभार मानायला तरी आम्हाला मतदारसंघात जायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहुमत सिद्ध व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आता आम्हाला लवकर घरी जायचे आहे, असे आमदारांनी नेत्यांनाच सांगितले आहे. आज सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार व काँग्रेसचे निरीक्षक खा. वेणुगोपाळ यांनी या आमदारांशी गप्पा मारल्या.आॅडिओ टेप्स खऱ्या की खोट्या?भाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवल्याच्या ध्वनिफिती बाहेर आल्या होत्या. त्यापैकी एका काँग्रेस आमदाराने आपल्या पत्नीस असे कोणतेही आमिष दाखवण्यात आले नव्हते. या आॅडिओ टेप खºया नाहीत, असे सांगून काँग्रेसलाच अडचणीत आणले. दुसºयाने मात्र भाजपाचे नेत्यांचे फोन येताच, त्याचे रेकॉर्डिंग केले. त्याने तीनदा भाजपाकडून आलेल्या फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग केले आहे. आपणास आमिष दाखवण्यात आले होते, असे तो म्हणाला.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपा