शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

CAA Protest : बहुसंख्याकांनी संयम गमावल्यास गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते- भाजपा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 16:25 IST

Citizen amendment act protest : विरोधकांना, आंदोलकांना भाजपा मंत्र्यानं करुन दिली गोध्र्याची आठवण

बंगळुरु: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण पेटलं असताना आता राजकीय नेत्यांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. बहुसंख्याकांनी संयम गमावल्यास गोध्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकेल, असा इशारा भाजपा नेते आणि कर्नाटकचे सांस्कृतिक मंत्री सी. टी. रवी यांनी दिला आहे. कर्नाटकमध्ये सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यास राज्य पेटेल, असं विधान काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यू. टी. खादेर यांनी केलं होतं. त्यांना रवी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खादेर यांच्या विधानाचा संदर्भ देत रवी यांनी जोरदार टीका केली. 'याच मानसिकतेमधून गोध्र्यात रेल्वे पेटवण्यात आली आणि कारसेवकांना जिवंत जाळण्यात आलं. पण त्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरादाखल काय घडलं याची खादेर यांना कल्पना असेल. गोध्र्यात रेल्वे जाळण्यात आल्यानंतर लोकांनी काय केलं, हे खादेर यांनी पाहिलं असेल. जर ते गोध्र्यातील ती घटना विसरले असतील, तर आम्ही त्यांना त्याची आठवण करुन देऊ,' असा धमकीवजा इशारा रवी यांनी दिला. बहुसंख्यांक शांत आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्या भागांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, अशा शब्दांमध्ये रवी यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. परिस्थिती चिघळवू पाहणाऱ्यांना त्यांनी यावेळी थेट इशारा दिला. बहुसंख्यांकांनी संयम राखला आहे म्हणून तुम्ही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही जरा मागे वळून पाहावं असा सल्ला मी देईन. गोध्र्यातील घटना आठवून पाहिल्यास आमचा संयम संपल्यावर काय होतं ते तुम्हाला कळेल. आमच्या संयमाला आमचा कमकुवतपणा समजू नका. तुम्ही राज्यातील सार्वजनिक संपत्तीचं कसं नुकसान करत आहात आणि परिस्थिती स्फोटक करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून कशा पद्धतीनं सुरू आहे, हे आम्ही पाहत आहोत, असं रवी म्हणाले.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेस