शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

'केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरातील घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 20:32 IST

केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात राष्ट्रीय लोकशाही घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग लावला जाणार आहे त्यामुळे या घडामोडींमधून घटक पक्षांनी धडा घ्यावा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी म्हटले आहे

पणजी : गोव्यात सरकारमधील घटक पक्षांना भाजपकडूनच जास्त धोका असल्याचे मंगळवारी मध्यरात्रीच्या फोडाफोडीनंतर सिध्द झाले आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात राष्ट्रीय लोकशाही घटक पक्षांच्या अस्तित्त्वालाच सुरुंग लावला जाणार आहे त्यामुळे या घडामोडींमधून घटक पक्षांनी धडा घ्यावा, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी म्हटले आहे. 

आम आदमी पक्षाचे प्रदेश निमंत्रक एल्विस गोम्स यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया देताना भाजप मित्रपक्षांवर कोणत्याही क्षणी असे हल्ले चढवू शकतो, असे म्हटले आहे. मंगळवारी मध्यरात्री ज्या घडामोडी घडल्या त्या पाहता भाजपला मित्रच नसल्याचे आणि त्यांचे राजकारण हे स्वार्थी असल्याचे स्पष्ट होते. गोमंतकीयांच्या आणि पुढील पिढीच्या हिताआड हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राजकारणातील संधीसाधूपणा, वैयक्तिक स्वार्थ आणि अनैतिकता अत्युच्च शिखरावर पोहचली असल्याचे म्हटले आहे. फोडाफोडी, घोडेबाजाराचा नंगानाच चालला आहे. पोटनिवडणुका लादून जनतेच्या पैशांचा अपव्यय चालला आहे. गोमंतकीय जनता या राजकारणाला कंटाळली आहे. विश्वासघात करणाऱ्यांना आगामी निवडणुकांमध्ये जनता घरी पाठवेल, असेही वेलिंगकर म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा