शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दहशतवाद्यांच्या घरवापसीसाठी लष्कर राबवणार 'हे' स्पेशल ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 16:20 IST

काश्मीरमधील दहशतवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न

जम्मू-काश्मीर: काश्मीर खोऱ्यात शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु असताना स्थानिक दहशतवादी स्वत:च्या कुटुंबीयांना भेटायला घरी येत असल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी त्यांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी निशस्त्र घरी परतत असल्यानं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लष्कराचे अधिकारी स्थानिक दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत आहेत.दहशतवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा आणि समाजाच्या मूळ प्रवाहात परतावं, यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांशी बातचीत सुरू केली आहे. 'एन्काऊंटरमध्ये मारले जाण्यापेक्षा सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सन्मानानं जगा,' असा संदेश कुटुंबीयांनी दहशतवाद्यांना द्यावा, यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्थानिक दहशतवाद्यांनी मूळ प्रवाहात परतावं, यासाठी लष्करानं 'ऑपरेशन ऑल इन' सुरू केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी वाट चुकलेल्या तरुणांना आणखी एक संधी दिली जावी, असा लष्कराचा विचार आहे. 'स्थानिक दहशतवादी तरुण त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावी परतत आहेत. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. कुटुंबीयांनी त्यांच्या मुलांची समजूत घालून त्यांना मूळ प्रवाहात आणावं, असं आम्हाला वाटतं. त्यांना त्यांचं अर्धवट राहिलेलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचं असल्यास त्यांना तशी संधीदेखील देण्यात येईल,' अशी माहिती लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. दहशतवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे आई, वडिल, नातेवाईक, त्यांच्या गावचे सरपंच यांच्याशी संवाद साधला जात आहे. 'एन्काऊंटरमध्ये जीव गमावण्यापेक्षा सर्वसामान्य आयुष्य जगा,' असा संदेश दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला