शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

‘तिवरे धरण दुर्घटनेतील वारसदारांना भरपाई द्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 11:32 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली.

नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून बळी पडलेल्या २३ जणांच्या वारसदारांना भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात गुरुवारी केली.ते म्हणाले की, ही धरणफुटी या भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झाली असे सांगितले जात आहे. पण त्या गोष्टीत तथ्य नाही. तिवरे धरणाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे असे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १२ फेब्रुवारी रोजी लेखी कळवूनही त्या दिशेने पावले उचलण्यात आली नाहीत. तब्बल १२ कोटी रुपये खर्चून २०१२ साली तिवरे धरण बांधण्यात आले होते. या प्रकल्पाचा मूळ खर्च २ कोटी रुपये होता पण कालांतराने त्यात खूप वाढ झाली. तिवरे धरण फुटल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना भरपाई देण्यात यावी, या दुर्घटनेत ज्यांची घरे वाहून गेली त्यांचे पुनर्वसन करावे अशा मागण्याही हुसेन दलवाई यांनी केल्या. ठेकेदार व अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही दलवाई यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiri Tiware Damरत्नागिरी तिवरे धरण