शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न द्या -श्रीरंग बारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:19 IST

शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केली. ते म्हणाले की, जोतीराव फुले यांचा जन्म पुण्यात झाला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी भारतीय समाजात परिवर्तनाची चळवळ सुरू केली.शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य वेचले. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, विधवांवर होणाºया अत्याचाराविरोधात आवाज उठवला. घरात शाळा सुरू केली. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळेच भारतीय समाज, महिला प्रगती करू शकल्या. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबार्इंना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे.शेतकºयांना मदतीसाठी चर्चा व्हावीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी संसदेत स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली. त्या म्हणाल्या, राज्यपालांनी दोन गटांमध्ये शेतकºयांना मदत जाहीर केली आहे.खरिपासाठी ८ हजार रुपये प्रतिहेक्टर तर हॉर्टिकल्चर करणाºया शेतकºयांना प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दिली आहे. अनेक खासदारांना ही मदत कमी वाटते. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीदेखील शेतकºयांना मदतीची विनंती केंद्राला केला.ते म्हणाले की, गेली दोन वर्षे दुष्काळ होता. यंदा पीक चांगले आले. कापणीची वेळ आली तेव्हा पाऊस आला. पीक हातचे गेले. सोयाबीन, द्राक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे.खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावेकोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापण्याची विनंती कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केली. कोल्हापूर व नजीकच्या जिल्ह्यांमधील लोकांना प्रलंबित खटल्यांसाठी मुंबईत खेट्या माराव्या लागतात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.ते म्हणाले, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील न्यायालयांमध्ये दहा लाख खटले प्रलंबित आहेत. याच खटल्यांच्या पुढील सुनावणीसाठी लोकांना मुंबईला खेट्या माºयावा लागतात.