शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न द्या -श्रीरंग बारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 02:19 IST

शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले

नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केली. ते म्हणाले की, जोतीराव फुले यांचा जन्म पुण्यात झाला. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी भारतीय समाजात परिवर्तनाची चळवळ सुरू केली.शेतकऱ्यांसाठी, महिला-विधवांच्या कल्याणासाठी महात्मा फुले यांनी आयुष्य वेचले. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षण, विधवांवर होणाºया अत्याचाराविरोधात आवाज उठवला. घरात शाळा सुरू केली. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळेच भारतीय समाज, महिला प्रगती करू शकल्या. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबार्इंना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे.शेतकºयांना मदतीसाठी चर्चा व्हावीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी संसदेत स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी केली. त्या म्हणाल्या, राज्यपालांनी दोन गटांमध्ये शेतकºयांना मदत जाहीर केली आहे.खरिपासाठी ८ हजार रुपये प्रतिहेक्टर तर हॉर्टिकल्चर करणाºया शेतकºयांना प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत दिली आहे. अनेक खासदारांना ही मदत कमी वाटते. उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीदेखील शेतकºयांना मदतीची विनंती केंद्राला केला.ते म्हणाले की, गेली दोन वर्षे दुष्काळ होता. यंदा पीक चांगले आले. कापणीची वेळ आली तेव्हा पाऊस आला. पीक हातचे गेले. सोयाबीन, द्राक्षांचे अतोनात नुकसान झाले आहे.खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावेकोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापण्याची विनंती कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी केली. कोल्हापूर व नजीकच्या जिल्ह्यांमधील लोकांना प्रलंबित खटल्यांसाठी मुंबईत खेट्या माराव्या लागतात, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.ते म्हणाले, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील न्यायालयांमध्ये दहा लाख खटले प्रलंबित आहेत. याच खटल्यांच्या पुढील सुनावणीसाठी लोकांना मुंबईला खेट्या माºयावा लागतात.