शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आईला वाचवण्यासाटी जीवावर उदार झाली मुलगी, तोंडाने ओढून घेतलं कोब्राचं विष, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 18:58 IST

Daughter Save Mother Life: आई आणि मुलांचं नातं हे वेगळंच असतं. त्याची कशासोबत तुलना होऊ शकत नाही. मुलांवर काही संकट आलं तर आई ढालीसारखी समोर येते. तर आईसाठी मुलं काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे

आई आणि मुलांचं नातं हे वेगळंच असतं. त्याची कशासोबत तुलना होऊ शकत नाही. मुलांवर काही संकट आलं तर आई ढालीसारखी समोर येते. तर आईसाठी मुलं काहीही करण्यास तयार असतात. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. येथील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरमधील कियूर येथे राहणाऱ्या ममता राय यांना कोब्रा या विषारी सापाने दंश केला. त्यानंतर आईला वाचण्यासाठी मुलगी श्रम्या राय हिने स्वत: आईच्या पायाला सर्पदंश झालेल्या ठिकाणाहून विष तोंडाने ओढून बाहेर काढले. श्रम्या ही कॉलेजमधील विद्यार्थिनी आहे. तर तिची आई ग्रामपंचायत सदस्य आहे. 

या बहादूर मुलीची गोष्ट केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे. ममता राय ह्या त्यांच्या आईसोबत शेतात गेल्या होत्या. त्या घरी परतत असताना त्यांना कोब्रा सापाने दंश केला. वाटेत चालताना त्यांचा पाय चुकून सापावर प़डला होता.. सर्पदंश झाल्याचे समजताच ममता यांनी शरीराच्या इतर भागात विष पसरू नये म्हणून त्यावर कोरडं गवत टाकलं. 

ममता यांनी घरी परतल्यावर सर्पदंश झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची मुलगी श्रम्या हिने त्वरित त्यांच्या पायातून विष ओढून बाहेर काढले. त्यानंतर ममता राय यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, श्रम्या हिने प्रसंगावधान राखत विष बाहेर काढल्याने ममता यांचे प्राण वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

ममता यांच्यावर एक दिवस उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. श्रम्या ही कॉलेजमध्ये गाइड रेंजर आणि स्काऊट आहे. तिने सांगितले की, कुठल्याही व्यक्तीला साप चावल्यास ते विष तोंडाने ओढून बाहेर काढतात, ह्या तंत्राबाबत मी ऐकले होते. तसेच चित्रपटांमध्येही पाहिले होते. दरम्यान, नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अध्ययनानुसार जागतिक पातलीवर सर्पदंशामुळे होणाऱ्या एकूण ७८ हजार ६०० मृत्युंपैकी सुमारे ६४ हजार १०० मृत्यू एकट्या भारतात होतात.  

टॅग्स :FamilyपरिवारKarnatakकर्नाटक