शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 13:34 IST

पाच दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील खुजनेर शहरात नायट्रोजन धुराचा वापर करण्यात आलेल्या एका इव्हेंटमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या भयंकर घटनेनंतर कुटुंब आणि स्थानिक लोक अशा धोकादायक इव्हेंटवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. ६ मे रोजी ही घटना घडली.

लग्न समारंभात नवरा-नवरीच्या एन्ट्रीसाठी नायट्रोजन धुराच्या पदार्थाने भरलेलं एक भांडं इव्हेंट मॅनेजरने ठेवलं होतं, जेणेकरून धुरामध्ये फोटो सेशन करता येईल. याच दरम्यान लग्नासाठी आलेली बाढगावची वाहिनी गुप्ता त्या भांड्यात पडली आणि ८० टक्के भाजली. तिला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदूरमधील अरबिंदो रुग्णालयात रेफर करण्यात आलं. पाच दिवस व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

वाहिनीचे वडील राजेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही कुटुंबासह एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलो होतो. तिथे केमिकलने भरलेलं एक भांडं होतं. वाहिनी खेळत असताना अचानक त्यात पडली. प्राथमिक उपचारानंतर आम्ही तिला इंदूरला नेलं, पण तिला वाचवता आलं नाही." नायट्रोजनसारख्या धोकादायक केमिकल्सचा वापर थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.

मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने वाहिनीचे नेत्रदान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या दुःखद घटनेने स्थानिक लोकांना धक्का बसला आहे. लग्न समारंभात कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय नायट्रोजनसारखं धोकादायक केमिकल कसं वापरलं जातं? आणि प्रशासन याकडे का लक्ष देत नाही? असे प्रश्न आता लोक विचारत आहेत.

टॅग्स :marriageलग्नMadhya Pradeshमध्य प्रदेश